शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

शेतकऱ्यांचा उद्रेक भडकत असताना मुख्यमंत्री गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST

भीमानगर : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी उजनीनिर्मिती करताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्याची तरतूद केली होती. परंतु बारामतीकरांनी ...

भीमानगर : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी उजनीनिर्मिती करताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्याची तरतूद केली होती. परंतु बारामतीकरांनी हे पाणी आठमाही नाही, तर सहामाहीवर आणले. ते करूनही भागले नाही की काय म्हणून उजनी धरणातील सांडपाण्याच्या नावाखाली ५ टीएमसी पाणी इंदापूरला पर्यायाने बारामतीला नेण्याचा घाट घातला आहे. असाच छळ बारामतीकरांनी सोलापूर जिल्ह्याचा सुरू केला असल्याचा आरोप जनहित संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी केला आहे.

या निर्णयास सबंध सोलापूर जिल्ह्यात विरोध होत असून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी पेटून उठले आहेत. त्यावर कहर म्हणजे उपमुख्यमंत्री-जलसंपदामंत्री यांनी सातत्याने घूमजाव करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना संतप्त करायचा प्रयत्न केला. या सर्व प्रकरणात आजपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, विठ्ठल आबा मस्के, सचिन पराडे पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रशांत महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासाहेब गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, सिद्धार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक, सौरभ आरकिले, अमोल पाटील, अकोले बु.चे सरपंच सतीश आबा सुर्वे, उपसरपंच बशीर मुलाणी, ग्रा.पं. सदस्य कल्याण नवले, रमेश पवार, तुषार पाटील, सुजीत दरगुडे या वेळी उपस्थित होते.

----