शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

‘सर्वच प्रयोग केवळ सरपंचांवर कशासाठी?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST

राज्यात १४,२३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. पण जनतेतून थेट सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. ...

राज्यात १४,२३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. पण जनतेतून थेट सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. दिवाळीपूर्वी आरक्षणाचा ड्रॉ काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आले. काही जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी रोस्टरनुसार ग्रामपंचायत सदस्यांचे व सरपंचांचे आरक्षण काढले. काही जिल्ह्यांचे आरक्षण काढले नाही. त्यात साेलापूर जिल्ह्याचाही समावेश आहे.

प्रथमच हा निर्णय का?

१९९५ पासून निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण सुरू झाले. त्यानंतर इतक्या वर्षांनी सरपंचपदासाठी आरक्षण बदलण्याचा निर्णय घेतला, तोही निवडणुकीनंतर. या निर्णयाला राज्यातील सर्व सरपंचांनी विरोध केला. सरपंच परिषदेचाही विरोध आहे. सरपंच परिषदेनेही शासन निर्णयाच्या विराेधात याचिका दाखल केली आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाचा निर्णय घेताना जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीसाठी का घेतला नाही. वेगळे प्रयोग केवळ सरपंचांच्या बाबतीत का केला जातो, असा आमचा सवाल आहे.

- जयंत पाटील,

अध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद, महाराष्ष्ट्र राज्य

कोट सरपंच ::::::::

खर्च करणार एक जण; दुसऱ्याला मिळेल संधी

निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार हा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. त्यास आमचा विरोध आहे. कारण, सरपंचपदाची संधी एकदाच मिळते, म्हणून निवडून येण्यासाठी खर्च एक जण करणार आणि नंतर आरक्षण जाहीर झाल्याने दुसऱ्यालाच सरपंचपद मिळेल. या निर्णयावर अनेक सदस्यही नाराज आहेत.

- ललिताबाई विजयकुमार ढोपरे,

सरपंच, वागदरी, ता. अक्कलकोट

कोट सरपंच ::::::::

या निर्णयामुळे सदस्यांची पळवापळवी थांबेल

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय योग्य वाटतो. त्यामुळे सदस्यांची पळवापळवी होणार नाही. तसेच सरपंचपद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल त्यालाच निवडून आणण्यासाठी किंवा पराभूत करण्यासाठी लक्ष्य केले जाणार नाही. शिवाय निवडणुकीचा खर्चही सरपंचपदाच्या उमेदवारालाच करावा लागतो, तो होणार नाही. या निर्णयामुळे खर्चाची विभागणी होईल.

- प्रमोद कुटे

सरपंच, ग्रामपंचायत टेंभुर्णी