शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

राज्यात सर्वाधिक गाजलेल्या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:23 IST

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. राज्यातील पोटनिवडणुकीचा इतिहास पाहिल्यास अनेक ठिकाणी पोटनिवडणूका बिनविरोध ...

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. राज्यातील पोटनिवडणुकीचा इतिहास पाहिल्यास अनेक ठिकाणी पोटनिवडणूका बिनविरोध करण्याची परंपरा होती. काही ठिकाणी झाल्या तर विरोधाला विरोध म्हणून काही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने अपरिहार्यतेमुळे त्या घ्याव्या लागल्याची उदाहरणे आहेत.

पंढरपूरची पोटनिवडणूक ही प्रारंभी बिनविरोध होईल, असा अंदाज होता. मात्र शेवटच्या टप्प्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर एका पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्य पातळीवरील मोठे नेते येण्याची परंपराही नसताना येथे मात्र दोन्ही बाजूकडून आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांची फौजच एकमेकांसमोर उभी ठाकली होती. महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मतदारसंघात तब्बल दोनवेळा मुक्काम ठोकत पाच दिवस प्रचार केला. त्यांच्यासोबत जयंत पाटील, धनंजय मुंडे, नाना पटोले, विश्वजीत कदम, दत्तात्रय भरणे, गुलाबराव पाटील आदी राज्यमंत्री मंडळातील मंत्री कामाला लागले होते. तर भाजपकडून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर आदींनी प्रचारसभा गाजवत निवडणुकीतील वातावरण ढवळून काढले होते.

या पोटनिवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवार निवडणूक मैदानात उभे असले तरी महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पूत्र भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे यांच्यात प्रमुख लढत झाली. शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे व अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी निवडणूका लढविल्या असल्या तरी ते किती व कोणाची मते खाणार यावरच दोन्ही उमेदवारांचा जय-पराजय अवलंबून असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यासाठी आणखी अकरा दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत गावागावात दररोज आमचाच उमेदवार निवडून येणार असे म्हणत उत्सुकता वाढत आहे.

स्थानिक मुद्दे बाजूलाचपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात सहकारी साखर कारखानदारीचे बिघडलेले नियोजन त्यामुळे शेतकरी, कामगारांना होणारा त्रास, मंगळवेढ्याची ३५ गावची पाणीपुरवठा योजना, रस्ते, पाणी, वीज, रोजगार आदी महत्त्वाचे मुद्दे असताना ही निवडणूक प्रारंभी महाविकास आघाडीकडून भावनिक मुद्द्यांवर लढविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर विरोधकांकडून तो मुद्दा खोडून काढत आ. परिचारक यांनी ज्यांच्यात नेतृत्व व कर्तृत्व असते त्यांनी भावनिक मुद्द्यावर मते न मागता विकासाच्या मुद्द्यावर मते मागावित असा प्रचार केला. या निवडणुकीत दोन्हीकडून झालेल्या प्रचारात स्थानिक मुद्दे मात्र पुन्हा अधांतरीच राहिल्याचे चित्र आहे.