शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

राज्यात सर्वाधिक गाजलेल्या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:23 IST

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. राज्यातील पोटनिवडणुकीचा इतिहास पाहिल्यास अनेक ठिकाणी पोटनिवडणूका बिनविरोध ...

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. राज्यातील पोटनिवडणुकीचा इतिहास पाहिल्यास अनेक ठिकाणी पोटनिवडणूका बिनविरोध करण्याची परंपरा होती. काही ठिकाणी झाल्या तर विरोधाला विरोध म्हणून काही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने अपरिहार्यतेमुळे त्या घ्याव्या लागल्याची उदाहरणे आहेत.

पंढरपूरची पोटनिवडणूक ही प्रारंभी बिनविरोध होईल, असा अंदाज होता. मात्र शेवटच्या टप्प्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर एका पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्य पातळीवरील मोठे नेते येण्याची परंपराही नसताना येथे मात्र दोन्ही बाजूकडून आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांची फौजच एकमेकांसमोर उभी ठाकली होती. महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मतदारसंघात तब्बल दोनवेळा मुक्काम ठोकत पाच दिवस प्रचार केला. त्यांच्यासोबत जयंत पाटील, धनंजय मुंडे, नाना पटोले, विश्वजीत कदम, दत्तात्रय भरणे, गुलाबराव पाटील आदी राज्यमंत्री मंडळातील मंत्री कामाला लागले होते. तर भाजपकडून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर आदींनी प्रचारसभा गाजवत निवडणुकीतील वातावरण ढवळून काढले होते.

या पोटनिवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवार निवडणूक मैदानात उभे असले तरी महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पूत्र भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे यांच्यात प्रमुख लढत झाली. शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे व अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी निवडणूका लढविल्या असल्या तरी ते किती व कोणाची मते खाणार यावरच दोन्ही उमेदवारांचा जय-पराजय अवलंबून असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यासाठी आणखी अकरा दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत गावागावात दररोज आमचाच उमेदवार निवडून येणार असे म्हणत उत्सुकता वाढत आहे.

स्थानिक मुद्दे बाजूलाचपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात सहकारी साखर कारखानदारीचे बिघडलेले नियोजन त्यामुळे शेतकरी, कामगारांना होणारा त्रास, मंगळवेढ्याची ३५ गावची पाणीपुरवठा योजना, रस्ते, पाणी, वीज, रोजगार आदी महत्त्वाचे मुद्दे असताना ही निवडणूक प्रारंभी महाविकास आघाडीकडून भावनिक मुद्द्यांवर लढविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर विरोधकांकडून तो मुद्दा खोडून काढत आ. परिचारक यांनी ज्यांच्यात नेतृत्व व कर्तृत्व असते त्यांनी भावनिक मुद्द्यावर मते न मागता विकासाच्या मुद्द्यावर मते मागावित असा प्रचार केला. या निवडणुकीत दोन्हीकडून झालेल्या प्रचारात स्थानिक मुद्दे मात्र पुन्हा अधांतरीच राहिल्याचे चित्र आहे.