शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वाधिक गाजलेल्या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:23 IST

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. राज्यातील पोटनिवडणुकीचा इतिहास पाहिल्यास अनेक ठिकाणी पोटनिवडणूका बिनविरोध ...

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. राज्यातील पोटनिवडणुकीचा इतिहास पाहिल्यास अनेक ठिकाणी पोटनिवडणूका बिनविरोध करण्याची परंपरा होती. काही ठिकाणी झाल्या तर विरोधाला विरोध म्हणून काही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने अपरिहार्यतेमुळे त्या घ्याव्या लागल्याची उदाहरणे आहेत.

पंढरपूरची पोटनिवडणूक ही प्रारंभी बिनविरोध होईल, असा अंदाज होता. मात्र शेवटच्या टप्प्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर एका पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्य पातळीवरील मोठे नेते येण्याची परंपराही नसताना येथे मात्र दोन्ही बाजूकडून आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांची फौजच एकमेकांसमोर उभी ठाकली होती. महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मतदारसंघात तब्बल दोनवेळा मुक्काम ठोकत पाच दिवस प्रचार केला. त्यांच्यासोबत जयंत पाटील, धनंजय मुंडे, नाना पटोले, विश्वजीत कदम, दत्तात्रय भरणे, गुलाबराव पाटील आदी राज्यमंत्री मंडळातील मंत्री कामाला लागले होते. तर भाजपकडून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर आदींनी प्रचारसभा गाजवत निवडणुकीतील वातावरण ढवळून काढले होते.

या पोटनिवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवार निवडणूक मैदानात उभे असले तरी महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पूत्र भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे यांच्यात प्रमुख लढत झाली. शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे व अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी निवडणूका लढविल्या असल्या तरी ते किती व कोणाची मते खाणार यावरच दोन्ही उमेदवारांचा जय-पराजय अवलंबून असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यासाठी आणखी अकरा दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत गावागावात दररोज आमचाच उमेदवार निवडून येणार असे म्हणत उत्सुकता वाढत आहे.

स्थानिक मुद्दे बाजूलाचपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात सहकारी साखर कारखानदारीचे बिघडलेले नियोजन त्यामुळे शेतकरी, कामगारांना होणारा त्रास, मंगळवेढ्याची ३५ गावची पाणीपुरवठा योजना, रस्ते, पाणी, वीज, रोजगार आदी महत्त्वाचे मुद्दे असताना ही निवडणूक प्रारंभी महाविकास आघाडीकडून भावनिक मुद्द्यांवर लढविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर विरोधकांकडून तो मुद्दा खोडून काढत आ. परिचारक यांनी ज्यांच्यात नेतृत्व व कर्तृत्व असते त्यांनी भावनिक मुद्द्यावर मते न मागता विकासाच्या मुद्द्यावर मते मागावित असा प्रचार केला. या निवडणुकीत दोन्हीकडून झालेल्या प्रचारात स्थानिक मुद्दे मात्र पुन्हा अधांतरीच राहिल्याचे चित्र आहे.