शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वाधिक गाजलेल्या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:23 IST

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. राज्यातील पोटनिवडणुकीचा इतिहास पाहिल्यास अनेक ठिकाणी पोटनिवडणूका बिनविरोध ...

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. राज्यातील पोटनिवडणुकीचा इतिहास पाहिल्यास अनेक ठिकाणी पोटनिवडणूका बिनविरोध करण्याची परंपरा होती. काही ठिकाणी झाल्या तर विरोधाला विरोध म्हणून काही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने अपरिहार्यतेमुळे त्या घ्याव्या लागल्याची उदाहरणे आहेत.

पंढरपूरची पोटनिवडणूक ही प्रारंभी बिनविरोध होईल, असा अंदाज होता. मात्र शेवटच्या टप्प्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर एका पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्य पातळीवरील मोठे नेते येण्याची परंपराही नसताना येथे मात्र दोन्ही बाजूकडून आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांची फौजच एकमेकांसमोर उभी ठाकली होती. महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मतदारसंघात तब्बल दोनवेळा मुक्काम ठोकत पाच दिवस प्रचार केला. त्यांच्यासोबत जयंत पाटील, धनंजय मुंडे, नाना पटोले, विश्वजीत कदम, दत्तात्रय भरणे, गुलाबराव पाटील आदी राज्यमंत्री मंडळातील मंत्री कामाला लागले होते. तर भाजपकडून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर आदींनी प्रचारसभा गाजवत निवडणुकीतील वातावरण ढवळून काढले होते.

या पोटनिवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवार निवडणूक मैदानात उभे असले तरी महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पूत्र भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे यांच्यात प्रमुख लढत झाली. शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे व अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी निवडणूका लढविल्या असल्या तरी ते किती व कोणाची मते खाणार यावरच दोन्ही उमेदवारांचा जय-पराजय अवलंबून असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यासाठी आणखी अकरा दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत गावागावात दररोज आमचाच उमेदवार निवडून येणार असे म्हणत उत्सुकता वाढत आहे.

स्थानिक मुद्दे बाजूलाचपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात सहकारी साखर कारखानदारीचे बिघडलेले नियोजन त्यामुळे शेतकरी, कामगारांना होणारा त्रास, मंगळवेढ्याची ३५ गावची पाणीपुरवठा योजना, रस्ते, पाणी, वीज, रोजगार आदी महत्त्वाचे मुद्दे असताना ही निवडणूक प्रारंभी महाविकास आघाडीकडून भावनिक मुद्द्यांवर लढविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर विरोधकांकडून तो मुद्दा खोडून काढत आ. परिचारक यांनी ज्यांच्यात नेतृत्व व कर्तृत्व असते त्यांनी भावनिक मुद्द्यावर मते न मागता विकासाच्या मुद्द्यावर मते मागावित असा प्रचार केला. या निवडणुकीत दोन्हीकडून झालेल्या प्रचारात स्थानिक मुद्दे मात्र पुन्हा अधांतरीच राहिल्याचे चित्र आहे.