शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कुठे सोन्याच्या हंड्यासाठी खोदला खड्डा; कोण पैशांच्या पावसासाठी मोजतो ८० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST

विठ्ठल खेळगी लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : कुठे सोन्याच्या हंड्यासाठी खड्डा खोदला जातो, कोण पैशांच्या पावसासाठी ८० हजार रुपये ...

विठ्ठल खेळगी

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : कुठे सोन्याच्या हंड्यासाठी खड्डा खोदला जातो, कोण पैशांच्या पावसासाठी ८० हजार रुपये मोजतो, कोण आजार कमी करण्यासाठी मांत्रिकाकडे जातो, पुत्रप्राप्तीसाठी भानामती करतात, म्हणून काही केले तरी लोकांच्या डोक्यातूनच अंधश्रद्धेचा भूत उतरेना झालंय. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाल्यानंतर आता अनेक संधिसाधू लोक उघडे पडत आहेत.

विज्ञानाने मोठी प्रगती केली. लोक चंद्रावर निघाले. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागले. असे असताना दुसरीकडे लोकांच्या डोक्यातून अंधश्रद्धा काही कमी होईना. शिकलेले लोकही मांत्रिकांच्या, बोगस सांधूंच्या भूलथापांना बळी पडत आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुवाबाजीचा पर्दाफाश कारण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आले आहे. करणी, भानामती, मांत्रिकांच्या मंत्रोपचाराला बळी न पडता त्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेतल्यास लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेचे भूत निश्चितच उतरणार आहे.

...............

आठ वर्षांत ११२ तक्रारी दाखल, २४ प्रकरणे कोर्टात

........

भानामती करणारी चौथी पिढी

अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी गावात करणी, भानामती वर्षानुवर्षे चालत आलेली होती. तब्बल चौथ्या पिढीकडून हा प्रकार सुरू होता. आजार कमी होण्यासाठी, भूत घालविण्यासाठी या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागत असे. कायदा अस्तित्वात आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांच्या मदतीने कोन्हाळीतील बुवाबाजीचा पर्दाफाश केला.

.............

शिक्षकही बुवाबाजीच्या जाळ्यात

केवळ अशिक्षित लोकच बुवाबाजीला बळी पडतात, असे नाही तर चक्क शिक्षकाने एका बुवाच्या जाळ्यात अडकला होता. पैशांचा पाऊस पाडतो, म्हणून एका बुवाने त्या शिक्षकाकडून तब्बल ७० ते ८० हजार रुपये घेतले. त्यानंतर बाहेरून काही बुवा येणार आहेत. आणखी एक विधी करायचा आहे, म्हणून त्या शिक्षकाकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर सलगरवस्ती पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला, तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याचा हंडा असल्याचे सांगून एका महिलेला खड्डा खोदण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला होता.

..............

कायदा झाल्यामुळे अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. मात्र, जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत ही बुवाबाजी थांबणार नाही. मंत्रोपचाराने, करणी केल्याने कोणताच आजार बरा होत नाही.

- यशवंत फडतरे, प्रमुख, बुवाबाजी विभाग, अंनिस

............

२०१३ मध्ये झाला कायदा

महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३, हा महाराष्ट्र राज्यातील एक गुन्हेगारी कायदा आहे. मुळात हा कायदा २००३ मध्ये जादूटोणाविरोधी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांनी तयार केलेला आहे. दाभोळकर यांच्या हत्येनंतर, २६ ऑगस्ट २०१३ रोजी हा कायदा पास झाला.