शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नीरा, खडकवासलातून इंदापूरला तरतूद केलेलं ७.९ टीएमसी पाणी गेलं कुठं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST

कुरुल : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा पाण्यासाठीचा संघर्ष हा आजचा संघर्ष नव्हे, तर तो कै. सूर्यकांत आप्पा ...

कुरुल : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा पाण्यासाठीचा संघर्ष हा आजचा संघर्ष नव्हे, तर तो कै. सूर्यकांत आप्पा रणवरे यांच्या नेतृत्वाखाली १९७१ सालीच सुरू झाला आहे. त्यांच्या व समितीच्या संघर्षाची दखल घेऊन इंदापूरच्या ‘त्या’ २२ गावांसाठी नीरा डाव्या कालव्यातून ४ टीएमसी व खडकवासला धरणातून ३.९ टीएमसी असे एकूण ७.९ टीएमसी पाण्याची सणसर कटची स्थापना करून शासकीय अध्यादेश काढून तरतूद केली आहे. ते पाणी कुठे गेले, असा सवाल उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केला आहे.

या पाण्याची तरतूद मार्च १९९४ ला पूर्ण झाली आहे. मात्र बारामतीकरांनी इंदापूरकरांच्या ताटातील ही भाकरी ओढून आपल्या ताटात घेतली आहे. आता ते सोलापूरकरांची भाकरी इंदापूरकरांच्या ताटात ओढत असल्याचा आरोप करत खूपसे-पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील शेळगाव, अथुर्णे, शिरसटवाडी, निमसाखर, निरवांगी, खोरोची, दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, गोतोंडी, रेडा, रेडणी, बोराटवाडी, चाकाटी, पिटकेव्वर, निमगाव - केतकी पिठेवाडी, लाखेवाडी, वडापुरी, काटी, भांडगाव, अवसरी या गावांच्या संबंधी हा पाण्याचा प्रश्न आहे.

या २२ गावांना बारमाही पाणी मिळावे यासाठी एका कृती समितीच्या माध्यमातून कै. सूर्यकांत आप्पा रणवरे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन कृती समितीच्या माध्यमातून १९७१ पासून आंदोलने, रास्ता रोको, उपोषण करण्यास सुरुवात केली. अखेर शासनाने सूर्यकांत रणवरे व शेतकऱ्यांच्या संघर्षाची दखल घेऊन २० फेब्रुवारी १९८९ रोजी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना आठमाहीऐवजी बारमाही पाणी देण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी संदर्भात अध्यादेशही काढला. मात्र, आज ५० वर्षांच्या काळानंतर हे त्या २२ गावांतील शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरले आहे.

---

२००९ ला बारामती सोडण्याचे हेच कारण होते

इंदापूरला पाणी देतो म्हणून तेथील शेतकऱ्यांना गंडविले. मात्र त्यांच्या हक्काचे आणि शासकीय अध्यादेश निघालेले ७.९ टीएमसी पाणी बारामतीकरांनी पळविले. त्यामुळे ‘त्या’ २२ गावांनी रास्ता रोको, उपोषण करून लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवारांनी तेथून पळ काढून माढा लोकसभा लढवली होती, असेही खूपसे म्हणाले.