शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नीरा, खडकवासलातून इंदापूरला तरतूद केलेलं ७.९ टीएमसी पाणी गेलं कुठं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST

कुरुल : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा पाण्यासाठीचा संघर्ष हा आजचा संघर्ष नव्हे, तर तो कै. सूर्यकांत आप्पा ...

कुरुल : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा पाण्यासाठीचा संघर्ष हा आजचा संघर्ष नव्हे, तर तो कै. सूर्यकांत आप्पा रणवरे यांच्या नेतृत्वाखाली १९७१ सालीच सुरू झाला आहे. त्यांच्या व समितीच्या संघर्षाची दखल घेऊन इंदापूरच्या ‘त्या’ २२ गावांसाठी नीरा डाव्या कालव्यातून ४ टीएमसी व खडकवासला धरणातून ३.९ टीएमसी असे एकूण ७.९ टीएमसी पाण्याची सणसर कटची स्थापना करून शासकीय अध्यादेश काढून तरतूद केली आहे. ते पाणी कुठे गेले, असा सवाल उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केला आहे.

या पाण्याची तरतूद मार्च १९९४ ला पूर्ण झाली आहे. मात्र बारामतीकरांनी इंदापूरकरांच्या ताटातील ही भाकरी ओढून आपल्या ताटात घेतली आहे. आता ते सोलापूरकरांची भाकरी इंदापूरकरांच्या ताटात ओढत असल्याचा आरोप करत खूपसे-पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील शेळगाव, अथुर्णे, शिरसटवाडी, निमसाखर, निरवांगी, खोरोची, दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, गोतोंडी, रेडा, रेडणी, बोराटवाडी, चाकाटी, पिटकेव्वर, निमगाव - केतकी पिठेवाडी, लाखेवाडी, वडापुरी, काटी, भांडगाव, अवसरी या गावांच्या संबंधी हा पाण्याचा प्रश्न आहे.

या २२ गावांना बारमाही पाणी मिळावे यासाठी एका कृती समितीच्या माध्यमातून कै. सूर्यकांत आप्पा रणवरे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन कृती समितीच्या माध्यमातून १९७१ पासून आंदोलने, रास्ता रोको, उपोषण करण्यास सुरुवात केली. अखेर शासनाने सूर्यकांत रणवरे व शेतकऱ्यांच्या संघर्षाची दखल घेऊन २० फेब्रुवारी १९८९ रोजी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना आठमाहीऐवजी बारमाही पाणी देण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी संदर्भात अध्यादेशही काढला. मात्र, आज ५० वर्षांच्या काळानंतर हे त्या २२ गावांतील शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरले आहे.

---

२००९ ला बारामती सोडण्याचे हेच कारण होते

इंदापूरला पाणी देतो म्हणून तेथील शेतकऱ्यांना गंडविले. मात्र त्यांच्या हक्काचे आणि शासकीय अध्यादेश निघालेले ७.९ टीएमसी पाणी बारामतीकरांनी पळविले. त्यामुळे ‘त्या’ २२ गावांनी रास्ता रोको, उपोषण करून लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवारांनी तेथून पळ काढून माढा लोकसभा लढवली होती, असेही खूपसे म्हणाले.