शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पांडुरंगाच्या दर्शनाला जाल तेव्हा हजारो वर्षांच्या मूर्ती पाहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST

पूर्वी काही कारणाने काही घराण्यातील वंश खंडित झाला. घरातील मूर्तींचे पूजन करण्यात अडचणी येऊ लागल्या किंवा घरात नवीन देवदेवतांच्या ...

पूर्वी काही कारणाने काही घराण्यातील वंश खंडित झाला. घरातील मूर्तींचे पूजन करण्यात अडचणी येऊ लागल्या किंवा घरात नवीन देवदेवतांच्या मूर्ती आणल्या तर पूर्वीच्या या मूर्ती समुद्रात अथवा नदीच्या पाण्यात विसर्जित केल्या जात असत. काही लोक या मूर्तींचे विसर्जन न करता प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणच्या मंदिरात नेऊन देत असत. पूर्वीच्या काळापासून ही प्रथा पाळली जात आली आहे.

पंढरपूर हे पूर्वीपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असल्याने ही मंडळी आपले देव विठ्ठल मंडईत आणून देत. येथे बैरागी कुटुंब गेल्या १८ पिढ्यांपासून या मूर्ती स्वीकारून त्यांचे पूजन करत होता. नामदेव महाद्वार बांधण्यापूर्वी १९९७ पर्यंत येथे ३३ कोटी देवता मंदिर महाद्वारात होत्या. बैरागी यांच्या १८ पिढ्या गेली ७०० वर्षांपासून येथे या मूर्ती घेण्याचे व त्यांचे पूजन करायचे काम करीत होती. यानंतर महाद्वाराचे बांधकाम करताना या ३३ कोटी देवता मंदिर पाडून, सर्व पुरातन मूर्ती मंदिर समितीने ताब्यात घेतल्या होत्या. याच मूर्ती मंदिरातील एका खोलीत ठेवून त्याचे पूजन होत होते.

मंदिर समिती प्रशासनाने या मूर्ती बाहेर काढून यातील अतिशय पुरातन आणि दुर्मीळ मूर्ती वेगळे करायचे काम केले आहे. काही मूर्ती एक फुटाच्या तर काही दोन फूट उंचीच्या आहेत. श्रीकृष्णाची विविध रूपे असलेल्या या कोरीव धातूंच्या मूर्ती अतिशय देखण्या व मौल्यवान आहेत. १ किलोपासून १२ किलो वजनापर्यंत या मूर्ती असून, अनेक लहान मूर्ती मात्र प्रशासनाने बाजूला ठेवून दिल्या आहेत.

आता या मूर्ती वेगळ्या केल्यावर विठ्ठल सभामंडपात या मूर्ती ठेवण्यासाठी एक दालन बनवले असून, या दालनात या पुरातन मूर्ती भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. सध्या कोरोनामुळे विठ्ठल मंदिर बंद असले तरी मंदिर खुले झाल्यानंतर या देखण्या पुरातन मूर्ती पाहण्याचा आनंद भाविकांना घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

----

या देवतांच्या मूर्ती

शेकडो वर्षांपूर्वीच्या कृष्ण, महादेव, गणेश, विष्णू, बालाजी, शाळीग्राम, यांसह देवीच्या विविध रूपातील कोरीव मूर्ती बाजूला काढल्या आहेत. यात गरुडाची मूर्ती, महिषासूर वध करणारी महिषासुरमर्दिनीची मूर्ती, रिद्धी-सिद्धीला घेऊन बसलेला गणेश, पार्वती मातेसह विराजमान महादेव अशा अनेक दुर्मीळ मूर्ती आहेत. गोपाल कृष्णाच्या मूर्तीजवळ गायी उभ्या असलेली मूर्तीही आहे. यातील काही मूर्ती तर ७०० ते एक हजार वर्षांपूर्वीच्या असून, या पंचधातू, तांबे, पितळ अशा धातूंपासून बनवलेल्या भरीव मूर्ती आहेत.