शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना प्रत्यक्षात उतरणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST

श्रीपूर : ‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण’ हा मोहिते-पाटील यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असून, गेली १७ वर्षे या योजनेचा पाठपुरावा ते करत ...

श्रीपूर : ‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण’ हा मोहिते-पाटील यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असून, गेली १७ वर्षे या योजनेचा पाठपुरावा ते करत आहेत; पण यश हाती लागेना. एकीकडे कोल्हापूर, सांगली व साताऱ्यातील महापुराचे महासंकट आणि दुसरीकडे सोलापूर व मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड आदी भागांत दुष्काळाचे कायम असलेले सावट, असे विसंगत चित्र दिसत असताना या भागासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाची गरज किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पण राजकारणापायी व राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे.

२००४ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प शासनाकडून मंजूर करून घेतला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत सुमारे पाच हजार कोटींची होती. या योजनेचे पाणी उजनी धरणात आणणे शक्य होणार आहे. या धरणातील एकूण ११७ टीएमसी पाण्यापैकी ९० टीएमसी पाण्याचे वाटप झाले आहे. पावसाळ्यात धरण भरले नाही तर मोठी अडचण होते. पर्याय म्हणून कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना सुरू व्हायला हवी, अशी मागणी सोलापूर, सांगली व मराठवाड्याच्या दुष्काळी पट्ट्यातून होत आहे. त्यामुळे दुष्काळी ३१ तालुक्यांतील १२ लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकेल

----

नुकसानीच्या खर्चाच्या पैशातून योजना शक्य

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी खर्च १५ हजार कोटींच्या घरात जातो. गेल्या महापुरामुळे जवळपास १० हजार कोटींचे नुकसान झाले होते. परंतु, सध्या कोल्हापूर, सांगली व सातारा भागांतील महापुरामुळे कोट्यवधींचे नुकसान होते. त्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे हजारो कोटींची मदत मागते. अशा नुकसानीसाठी होणाऱ्या खर्चाएवढ्या पैशातून कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना उभारणे शक्य आहे.

----

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी कृष्णा-भीमा स्थिरीकरण या योजनेच्या पूर्ततेसाठी जागतिक बँकेकडे प्रस्ताव दिला होता. आघाडी सरकारने त्याच्याकडे राजकारण म्हणून न पाहता सकारात्मकतेने पहावे. पूरपरिस्थितीमुळे दरवर्षी होणारे नुकसान थांबले. त्यासाठी या योजनेचा सकारात्मक विचार करावा.

- रणजितसिंह मोहिते-पाटील

आमदार, विधान परिषद