शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

निवडणूक आली अन् सारेच जागे झाले; मेळावे, कार्यक्रमांतून संवाद वाढू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST

शिवानंद फुलारी अक्कलकोट : राज्य शासनाने नगरपालिका निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. यामुळे विविध राजकीय पक्षांनी मेळावे ...

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : राज्य शासनाने नगरपालिका निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. यामुळे विविध राजकीय पक्षांनी मेळावे घेऊन उमेदवारांची चाचपणी घेणे सुरू केले आहे. अक्कलकोटच्या नगरपालिका निवडणुकीत भाजप, रासप, रिपाइं या महायुती विरुद्ध काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीची लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

ही निवडणूक आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे अस्तित्व ठरवणारी असेल. २३ ऑगस्टपासून प्रभाग, वॉर्ड रचना अशा कामांना प्रारंभ करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. यामुळे भाजपकडून नुकताच बूथ कमिटी मेळावा, रक्षाबंधन कार्यक्रमाबरोबरच उमेदवार चाचपणी सुरू केली आहे.

मुंबईचे आमदार व पक्षाचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी अक्कलकोटमध्ये येऊन निवडणुकीसंबंधी कानमंत्र दिल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसनेही जेऊर येथे मेळावा घेऊन वातावरण निर्माण केले आहे. एमआयएम, भारिप अशा काही पक्ष, संघटना स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अक्कलकोट नगरपालिकेवर अधिक काळ भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. याचे श्रेय जुन्या मुरब्बी नेत्यांना जाते. यंदा खेडगी परिवार वेगळी चूल मांडण्याच्या हालचाली दिसत आहेत. यामुळे आमदार कल्याणशेट्टी यांना पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक हाताळावी लागणार आहे.

सध्या विविध पक्षांमधील जुन्यांची गळती, नव्यांची भरती पाहता प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी महेश हिंडोळेंसारख्या अनुभवी नगरसेवकांना विश्वासात घेणे फायदेशीर ठरणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी पूर्वीच्या दिमतीने फिल्डिंग लावून आजी, माजी पदाधिकारी या सर्वांना सोबत घेऊन जातीची समीकरणे जुळवणे सोयीचे होणार आहे.

------

खेडगींनी वेगळी चूल मांडल्यास मतांची विभागणी

अक्कलकोट शहर नेहमी भाजपच्या पाठीशी राहिलेले आहे. मात्र नगरपालिका निवडणुकीत उमेदवार फायनल करताना ज्या-ज्या वेळी नियोजन चुकले त्या-त्या वेळी फटका बसला आहे. त्याच धर्तीवर अनुभवींची मदत घेणे आवश्यक ठरणार आहे. यंदा विद्यमान नगराध्यक्ष खेडगी यांनी वेगळी चूल मांडल्यास भाजपच्या मतांची विभागणी होऊ शकते. शिवाय काँग्रेसची महाविकास आघाडी झाली तर भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

----

आजी-माजींची प्रतिष्ठा पणाला

- नगरपालिका निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा ठरवणारी ही निवडणूक असणार आहे. दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, दुरावलेल्यांना जवळ करण्यासाठी विविध कार्यक्रमांवर भर दिला आहे. मागील वेळी काय चुकले याचा विचार करून रणनीती आखण्याचे नियोजन सुरू आहे.

---