शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

‘राज ठाकरेंना साहित्यातील काय कळते?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 04:46 IST

समाजात जे काही घडते त्यावर साहित्यिकांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे़ केरळ, तामिळनाडूतील साहित्यिक अशी भूमिका घेत असताना महाराष्ट्रातील साहित्यिक...

सोलापूर : समाजात जे काही घडते त्यावर साहित्यिकांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे़ केरळ, तामिळनाडूतील साहित्यिक अशी भूमिका घेत असताना महाराष्ट्रातील साहित्यिक गप्प का, असा सवाल करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे हे वक्तव्य चुकीचे असून त्यांना साहित्यातील काय कळते, असा टोला बडोदा येथे होणा-या ९१ व्या अ़ भा़साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लगावला.सांगली जिल्ह्यातील औदुंबर साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या गुपचिळी भूमिकेवर बोट ठेवले होते. त्यावर देशमुख म्हणाले, दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा सर्वप्रथम निषेध आपण व्यक्त केला होता. मी सातत्याने सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. त्यामुळे मराठी साहित्यिक भूमिका घेत नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे.मराठी शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा देशमुख यांनी निषेध केला. ते म्हणाले, इंग्रजी भाषेबाबत पालकांचा समज चुकीचा आहे़ दक्षिण भारतातील राज्यांमध्ये स्थानिक भाषा दैनंदिन व्यवहार, प्रशासकीय कामकाज आणि शिक्षणात सक्तीची आणि अनिवार्य केली आहे़ मग महाराष्ट्र सरकार असे का करत नाही? ही स्थिती अशीच राहिली तर येत्या १०-१२ वर्षात मराठी भाषा शिल्लक राहाणार नाही, अशी चिंताही देशमुख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे