शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

‘राज ठाकरेंना साहित्यातील काय कळते?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 04:46 IST

समाजात जे काही घडते त्यावर साहित्यिकांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे़ केरळ, तामिळनाडूतील साहित्यिक अशी भूमिका घेत असताना महाराष्ट्रातील साहित्यिक...

सोलापूर : समाजात जे काही घडते त्यावर साहित्यिकांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे़ केरळ, तामिळनाडूतील साहित्यिक अशी भूमिका घेत असताना महाराष्ट्रातील साहित्यिक गप्प का, असा सवाल करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे हे वक्तव्य चुकीचे असून त्यांना साहित्यातील काय कळते, असा टोला बडोदा येथे होणा-या ९१ व्या अ़ भा़साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लगावला.सांगली जिल्ह्यातील औदुंबर साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या गुपचिळी भूमिकेवर बोट ठेवले होते. त्यावर देशमुख म्हणाले, दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा सर्वप्रथम निषेध आपण व्यक्त केला होता. मी सातत्याने सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. त्यामुळे मराठी साहित्यिक भूमिका घेत नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे.मराठी शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा देशमुख यांनी निषेध केला. ते म्हणाले, इंग्रजी भाषेबाबत पालकांचा समज चुकीचा आहे़ दक्षिण भारतातील राज्यांमध्ये स्थानिक भाषा दैनंदिन व्यवहार, प्रशासकीय कामकाज आणि शिक्षणात सक्तीची आणि अनिवार्य केली आहे़ मग महाराष्ट्र सरकार असे का करत नाही? ही स्थिती अशीच राहिली तर येत्या १०-१२ वर्षात मराठी भाषा शिल्लक राहाणार नाही, अशी चिंताही देशमुख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे