शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

गजानन महाराज पालखीचे स्वागत

By admin | Updated: July 3, 2014 01:21 IST

श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बुधवारी सकाळी ९.३0 वा. सोलापुरात आगमन झाले

जाय पंढरीसी जाय पंढरीसी । पाहू विठोबाशी डोळेभरी ।।सोलापूर : पुंडलिके सुख दाखविले लोका। विठ्ठल नाम नौका तरावया ।।१।।जाय पंढरीसी जाय पंढरीसी । पाहू विठोबाशी डोळेभरी ।।२।।अवघा पर्वकाळ तयाचिये । नको आणिके ठायी जाऊ वाया ।।३।।चोखा म्हणे एैसा लाभ बांधा गाठी । जावोनिया मिठी पायी घाला ।।४।।हा संत चोखा महाराजांचा अभंग गात शेगाव येथून निघालेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बुधवारी सकाळी ९.३0 वा. सोलापुरात आगमन झाले. पालखीचे स्वागत सोलापूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी केले. यावेळी परिवहन समितीचे सभापती आनंद मुस्तारे, नगरसेविका इंदिरा कुडक्याल, राजश्री कणके, नगरसेवक नागेश वल्याळ, संजय कोळी, अविनाश पाटील, माजी आमदार निर्मला ठोकळ आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागताप्रसंगी सर्व मान्यवरांचे श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. पुढे शहरातील पारंपरिक मार्गावरून ही पालखी मार्गस्थ झाली. पालखी दि.५ जून २०१४ रोजी शेगाव येथून निघाली आहे. या पालखीत ६५0 वारकरी, १ प्रतीकात्मक गजराज, ३ अश्व, ८ वाहनांचा समावेश होता. पालखीतील वारकरी भक्तीमध्ये तल्लीन होऊन टाळ वाजवत राजा राम राम...सीता राम...जय जय राम...चा जयघोष करीत होते. ठिकठिकाणी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत होते. लहान मुलांपासून वृद्ध महिला-पुरुष मोठ्या भक्तीने गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत होते. वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, नाष्टा देत होते. पांढरेशुभ्र कपडे, डोक्यावर पांढरी गांधी टोपी, हातामध्ये भगवे झेंडे घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी रांगेत जात होते. पालखीच्या पुढे बँड पथकामार्फत बॅन्जो वाजविला जात होता. त्याच्या पाठीमागे दोन घोडेस्वार आणि नंतर झेंडेधारी वारकऱ्यांच्या दोन रांगा होत्या. त्यांच्या पाठीमागील भागात वारकरी तल्लीन होऊन अभंगाच्या गीतावर टाळ वाजवत होते. पालखीतील सनई चौघड्याच्या आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. --------------------दोन दिवस मुक्काम...शेगाव येथून आलेल्या श्री गजानन महाराज पालखीचा आज बुधवारी कुचन प्रशालेत मुक्काम असणार आहे. रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता शहरातील प्रमुख मार्गांवरून ही पालखी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात येऊन तेथे पालखीचा मुक्काम होणार आहे. तेथेही कीर्तन होणार आहे. दोन्ही ठिकाणी भाविकांना कीर्तन श्रवणाचा व श्रींच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.शुक्रवारी सकाळी ही पालखी पंढरपूरकडे वारीसाठी मार्गस्थ होणार आहे. --------------------------३३ दिवसांचा प्रवास५ जून रोजी शेगाव येथून निघालेली ही पालखी सोलापुरातील मुक्कामानंतर पंढरपूरला मार्गस्थ होणार आहे. शेगाव ते पंढरपूर हा ३३ दिवसांचा प्रवास असून ७५0 कि.मी.चा पायी प्रवास पालखी सोहळ्यातून केला जातो. श्रींच्या पालखीचे हे ४७ वे वर्ष असून अखंडपणे ही वारी केली जाते. वारकऱ्यांकरिता वैद्यकीय सेवा...पालखीतील वारकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थानच्या वतीने वैद्यकीय सेवा दिली जाते. यामध्ये एक अ‍ॅम्बुलन्स गाडी, डॉक्टर व त्यांचे सहकारी आहेत. पालखीच्या कालावधीत वारकऱ्यांना ही वैद्यकीय सेवा दिली जाते. पिण्याच्या पाण्याची सोय...वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून संस्थानच्या वतीने टँकरची सोयही करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागत...श्रींच्या पालखीचे गावोगावी मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. मोठ्या श्रद्धेने, भक्तिभावाने वारकऱ्यांना अन्नदान केले जाते. परतीचा प्रवास...श्रींच्या पालखीचा श्री क्षेत्र पंढरपूर येथे (चतुर्दशी) चौदापर्यंत मुक्काम असतो. त्यानंतर काला करून श्रींची पालखी पौर्णिमेला परतीच्या प्रवासाला सुरुवात करते.