शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सोलापूर शहरावर जलसंकट, औज बंधाºयातील पाण्याने तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 18:29 IST

सोलापूर दि २५ : टाकळी योजनेतून सोलापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त असलेला औज बंधारा कोरडा झाला आहे. टाकळी इंटेकजवळ साडेपाच फूट पाणी असून, उजनीतून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी २८ जुलै रोजी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे. 

ठळक मुद्दे२८ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे खात्याची बोलावली बैठकसर्वांचे डोळे ढगाकडे विवंचनेत पदाधिकारी व अधिकारी अडकले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५ : टाकळी योजनेतून सोलापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त असलेला औज बंधारा कोरडा झाला आहे. टाकळी इंटेकजवळ साडेपाच फूट पाणी असून, उजनीतून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी २८ जुलै रोजी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे. महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाणी परिस्थितीचा आढावा घेतला. सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी औज बंधाºयातून उजनीतून भीमेत पाणी सोडण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. महापौर, पालकमंत्री यांच्यामार्फत केलेली मागणी जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी औज व चिंचपूर बंधाºयातील पाणी स्थितीची पाहणी केली आहे. उजनीतून भीमेत पाणी सोडल्यास सहा दिवसात औज बंधाºयात येईल, असे पाटबंधारे अधिकाºयांनी सांगितले आहे. पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाने उजनी धरणात पाणी आले आहे. पण सोलापूर जिल्ह्यात व औज बंधारा परिसरात पाऊस नाही. वारे व उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे औज बंधारा रिकामा करून चिंचपूर बंधाºयात पाणी घेण्यात आले आहे. टाकळी इंटेकजवळ ५ फूट ४ इंच पाणी आहे. ३0 जुलैपर्यंत हे पाणी पुरेल. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात पाऊस न झाल्यास स्थिती बिकट होणार आहे. त्यामुळे २८ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे. पावसाने ताण दिल्यास पाणीपाळी एक दिवसाने पुढे नेण्याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. गतवर्षीही जुलै महिन्यात पाण्याची हीच स्थिती राहिली. नेमके पाणी सोडल्यानंतर पाऊस सुरू झाला. औज बंधाºयातून पाण्याच्या चार पाळ्या घेतल्या जातात. गेल्यावर्षी तीनच पाळ्यात पाणी घेण्यात आले. आता पावसाळा असला तरी पाऊसच न झाल्याने पाणीपाळी घेण्याची वेळ आली आहे. उजनीतून पाणी सोडले तर पाणी सोडल्यापासूनचे बिल महापालिकेस भरावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे डोळे ढगाकडे लागले आहेत. दररोज ढग भरून येतात, पावसाची स्थिती निर्माण होते पण दिवस कोरडा जातो. या स्थितीत नेमका काय निर्णय घ्यावा, या विवंचनेत पदाधिकारी व अधिकारी अडकले आहेत.