शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

सोलापूर शहरावर जलसंकट, औज बंधाºयातील पाण्याने तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 18:29 IST

सोलापूर दि २५ : टाकळी योजनेतून सोलापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त असलेला औज बंधारा कोरडा झाला आहे. टाकळी इंटेकजवळ साडेपाच फूट पाणी असून, उजनीतून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी २८ जुलै रोजी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे. 

ठळक मुद्दे२८ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे खात्याची बोलावली बैठकसर्वांचे डोळे ढगाकडे विवंचनेत पदाधिकारी व अधिकारी अडकले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५ : टाकळी योजनेतून सोलापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त असलेला औज बंधारा कोरडा झाला आहे. टाकळी इंटेकजवळ साडेपाच फूट पाणी असून, उजनीतून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी २८ जुलै रोजी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे. महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाणी परिस्थितीचा आढावा घेतला. सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी औज बंधाºयातून उजनीतून भीमेत पाणी सोडण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. महापौर, पालकमंत्री यांच्यामार्फत केलेली मागणी जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी औज व चिंचपूर बंधाºयातील पाणी स्थितीची पाहणी केली आहे. उजनीतून भीमेत पाणी सोडल्यास सहा दिवसात औज बंधाºयात येईल, असे पाटबंधारे अधिकाºयांनी सांगितले आहे. पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाने उजनी धरणात पाणी आले आहे. पण सोलापूर जिल्ह्यात व औज बंधारा परिसरात पाऊस नाही. वारे व उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे औज बंधारा रिकामा करून चिंचपूर बंधाºयात पाणी घेण्यात आले आहे. टाकळी इंटेकजवळ ५ फूट ४ इंच पाणी आहे. ३0 जुलैपर्यंत हे पाणी पुरेल. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात पाऊस न झाल्यास स्थिती बिकट होणार आहे. त्यामुळे २८ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे. पावसाने ताण दिल्यास पाणीपाळी एक दिवसाने पुढे नेण्याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. गतवर्षीही जुलै महिन्यात पाण्याची हीच स्थिती राहिली. नेमके पाणी सोडल्यानंतर पाऊस सुरू झाला. औज बंधाºयातून पाण्याच्या चार पाळ्या घेतल्या जातात. गेल्यावर्षी तीनच पाळ्यात पाणी घेण्यात आले. आता पावसाळा असला तरी पाऊसच न झाल्याने पाणीपाळी घेण्याची वेळ आली आहे. उजनीतून पाणी सोडले तर पाणी सोडल्यापासूनचे बिल महापालिकेस भरावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे डोळे ढगाकडे लागले आहेत. दररोज ढग भरून येतात, पावसाची स्थिती निर्माण होते पण दिवस कोरडा जातो. या स्थितीत नेमका काय निर्णय घ्यावा, या विवंचनेत पदाधिकारी व अधिकारी अडकले आहेत.