शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरावर जलसंकट, औज बंधाºयातील पाण्याने तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 18:29 IST

सोलापूर दि २५ : टाकळी योजनेतून सोलापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त असलेला औज बंधारा कोरडा झाला आहे. टाकळी इंटेकजवळ साडेपाच फूट पाणी असून, उजनीतून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी २८ जुलै रोजी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे. 

ठळक मुद्दे२८ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे खात्याची बोलावली बैठकसर्वांचे डोळे ढगाकडे विवंचनेत पदाधिकारी व अधिकारी अडकले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५ : टाकळी योजनेतून सोलापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त असलेला औज बंधारा कोरडा झाला आहे. टाकळी इंटेकजवळ साडेपाच फूट पाणी असून, उजनीतून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी २८ जुलै रोजी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे. महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाणी परिस्थितीचा आढावा घेतला. सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी औज बंधाºयातून उजनीतून भीमेत पाणी सोडण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. महापौर, पालकमंत्री यांच्यामार्फत केलेली मागणी जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी औज व चिंचपूर बंधाºयातील पाणी स्थितीची पाहणी केली आहे. उजनीतून भीमेत पाणी सोडल्यास सहा दिवसात औज बंधाºयात येईल, असे पाटबंधारे अधिकाºयांनी सांगितले आहे. पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाने उजनी धरणात पाणी आले आहे. पण सोलापूर जिल्ह्यात व औज बंधारा परिसरात पाऊस नाही. वारे व उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे औज बंधारा रिकामा करून चिंचपूर बंधाºयात पाणी घेण्यात आले आहे. टाकळी इंटेकजवळ ५ फूट ४ इंच पाणी आहे. ३0 जुलैपर्यंत हे पाणी पुरेल. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात पाऊस न झाल्यास स्थिती बिकट होणार आहे. त्यामुळे २८ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पाटबंधारे खात्याची बैठक बोलावली आहे. पावसाने ताण दिल्यास पाणीपाळी एक दिवसाने पुढे नेण्याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. गतवर्षीही जुलै महिन्यात पाण्याची हीच स्थिती राहिली. नेमके पाणी सोडल्यानंतर पाऊस सुरू झाला. औज बंधाºयातून पाण्याच्या चार पाळ्या घेतल्या जातात. गेल्यावर्षी तीनच पाळ्यात पाणी घेण्यात आले. आता पावसाळा असला तरी पाऊसच न झाल्याने पाणीपाळी घेण्याची वेळ आली आहे. उजनीतून पाणी सोडले तर पाणी सोडल्यापासूनचे बिल महापालिकेस भरावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे डोळे ढगाकडे लागले आहेत. दररोज ढग भरून येतात, पावसाची स्थिती निर्माण होते पण दिवस कोरडा जातो. या स्थितीत नेमका काय निर्णय घ्यावा, या विवंचनेत पदाधिकारी व अधिकारी अडकले आहेत.