शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

औज बंधार्‍यात सहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

By admin | Updated: June 6, 2014 01:12 IST

पाच टी.एम.सी. सोडण्याचा निर्णय : शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होणार

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा होणार्‍या औज बंधार्‍यात उजनीवरून पाणी सोडण्यात न आल्याने सध्या पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. पाणी सोडण्याबाबत गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत ५ टी.एम.सी. पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. असे असले तरी शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. सोलापूर शहराला उजनीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी भीमा नदीतून औज बंधार्‍यात हे पाणी सोडले जाते. रोटेशन पद्धतीने दि. १ जून रोजी हे पाणी उजनी धरणातून सोडणे आवश्यक होते, मात्र तसे न झाल्याने औज बंधार्‍याच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या मृतसाठा शिल्लक असून बंधार्‍यात चारी मारून पाण्याचा उपसा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज औज बंधार्‍यातून ५५ ते ६0 एम.एल.डी. पाण्याचा उपसा केला जातो. तसेच उजनीहून थेट पाईपलाईनने ५५ ते ६0 एम.एल.डी. पाण्याचा उपसा केला जातो. तर एकरुख (हिप्परगा) तलावातून १0 एम.एल.डी. पाण्याचा उपसा केला जातो. वास्तविक पाहता शहराला दररोज १३५ एम.एल.डी. पाण्याची आवश्यकता असताना फक्त १00 ते ११0 एम.एल.डी. पाणी प्राप्त होते. त्यामध्ये औज बंधार्‍यातील पाण्यावर निम्म्यापेक्षा जास्त शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. असे असताना सध्या बंधार्‍यात पाणीच नसल्याने फक्त ५ ते ६ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याबाबत दि. ३ जून रोजी पाटबंधारे मंत्र्यांसमवेत बैठक झाली होती; मात्र यावर निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शहरासमोर पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत गुरुवारी आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने यांची जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली; मात्र निर्णय झाला नव्हता. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ५ टी.एम.सी. पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत. हे पाणी पोहोचण्यास ८ दिवस लागणार असून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.------------------------------पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत, मात्र हे पाणी ६ ते ७ हजार क्युसेक्सने सोडल्यास ते औज बंधार्‍यात पोहोचण्यास आठ दिवस लागतील. - विजय राठोड सार्वजनिक आरोग्य अभियंता