शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळ शहरावर पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: May 20, 2014 00:54 IST

शेतीपंपाने बेसुमार उपसा : दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

मोहोळ : शहरासाठी पिण्याचा पाणीपुरवठा करणार्‍या आष्टे-कोळेगाव बंधार्‍यात केवळ दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे मोहोळ शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या परिसरात २४ तास चालणार्‍या शेकडो शेतीपंपांमुळे पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी मोहोळ ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सतीश काळे यांनी केली आहे. ३५ ते ४० हजार लोकसंख्येच्या मोहोळ शहराला आष्टे-कोळेगाव बंधार्‍यातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. बंधार्‍यात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंतच शहराला पाणीपुरवठा करता येणार आहे. बंधार्‍यातील पाणी संपल्यानंतर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येते, अशी परिस्थिती गेल्या २५ वर्षांपासून आहे, मात्र त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. सध्या उन्हाचा पारा शिगेला पोहोचला आहे. उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी या बंधार्‍यात एक मे रोजी आडविण्यात आले होते. शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन व शेतीपंपाचा उपसा लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने चार मीटर इतके पाणी आडविले होते. परंतु २४ तास शेतीचे पंप चालू असल्याने केवळ २० दिवसातच अडीच मीटर पाणी संपले आहे. सध्या दीड मीटर इतके पाणी शिल्लक आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा व जून महिन्याचा विचार करता बंधार्‍यात केवळ दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सीना नदीच्या पात्रातून उजनीची तिसरी पाळी सोडण्यासाठी भीमा-सीना जोडकालव्याच्या लेव्हलला धरणाची पातळी आल्याने नदीद्वारे आता पाणी येणार नाही हे निश्चित असल्याने शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी राखून न ठेवल्यास ऐन जून महिन्यात मोहोळकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायत व महसूल विभागाला याबाबत लेखी पत्र दिले आहे. मोहोळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही उपसरपंच सतीश काळे यांनी तहसीलदारांनी तातडीने नदी परिसरात वीजपुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले आहे.