शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

मोहोळ शहरावर पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: May 20, 2014 00:54 IST

शेतीपंपाने बेसुमार उपसा : दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

मोहोळ : शहरासाठी पिण्याचा पाणीपुरवठा करणार्‍या आष्टे-कोळेगाव बंधार्‍यात केवळ दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे मोहोळ शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या परिसरात २४ तास चालणार्‍या शेकडो शेतीपंपांमुळे पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी मोहोळ ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सतीश काळे यांनी केली आहे. ३५ ते ४० हजार लोकसंख्येच्या मोहोळ शहराला आष्टे-कोळेगाव बंधार्‍यातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. बंधार्‍यात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंतच शहराला पाणीपुरवठा करता येणार आहे. बंधार्‍यातील पाणी संपल्यानंतर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येते, अशी परिस्थिती गेल्या २५ वर्षांपासून आहे, मात्र त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. सध्या उन्हाचा पारा शिगेला पोहोचला आहे. उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी या बंधार्‍यात एक मे रोजी आडविण्यात आले होते. शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन व शेतीपंपाचा उपसा लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने चार मीटर इतके पाणी आडविले होते. परंतु २४ तास शेतीचे पंप चालू असल्याने केवळ २० दिवसातच अडीच मीटर पाणी संपले आहे. सध्या दीड मीटर इतके पाणी शिल्लक आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा व जून महिन्याचा विचार करता बंधार्‍यात केवळ दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सीना नदीच्या पात्रातून उजनीची तिसरी पाळी सोडण्यासाठी भीमा-सीना जोडकालव्याच्या लेव्हलला धरणाची पातळी आल्याने नदीद्वारे आता पाणी येणार नाही हे निश्चित असल्याने शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी राखून न ठेवल्यास ऐन जून महिन्यात मोहोळकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायत व महसूल विभागाला याबाबत लेखी पत्र दिले आहे. मोहोळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही उपसरपंच सतीश काळे यांनी तहसीलदारांनी तातडीने नदी परिसरात वीजपुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले आहे.