शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाणी सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे, बारामतीकरांसाठी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST

मोहोळ : उजनीच्या पाच टीएमसी पाण्याच्या निर्णयावरून मोहोळ तालुक्यात आता राजकीय रंग चढू लागला आहे. माजी आमदार ...

मोहोळ : उजनीच्या पाच टीएमसी पाण्याच्या निर्णयावरून मोहोळ तालुक्यात आता राजकीय रंग चढू लागला आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी धरणाची उंची वाढवू, इंदापूरला पाणी नेण्यास काहीच हरकत नाही, असे केलेल्या विधानावर शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांनी आक्षेप घेतला आहे. जरी धरणाची उंची वाढविली तरी ते पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे, बारामतीकरांसाठी नाही असा आरोप केला आहे. सोमेश क्षीरसागर म्हणाले, माजी आमदार राजन पाटील यांनी सर्वच वर्तमानपत्रांना सांगितले की, उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी नेण्यास आमचा विरोध आहे. कारण हे पाणी नेले तर शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय होईल. त्यांच्या या वक्तव्याचा अभिमान वाटला; परंतु त्यांनी सांगितले की, १९९३ रोजी मंत्रिमंडळातील निर्णयानुसार धरणाची उंची २ मीटरने वाढवली तर धरणात १२ टीएमसी पाण्याची वाढ होईल. त्यामुळे ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेता येईल. म्हणजे १२ टीएमसी पाण्याची अतिरिक्त वाढ झाली तर ५ टीएमसी इंदापूरला व राहिलेले ७ टीएमसी पाणी कर्जत जामखेडला जावू शकते, असा आरोप करत उजनीचे धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठीच आहे आणि त्याचा वापर सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या व शेतकरी कष्ठकरी जनतेच्या हक्काचे आहे. त्याचा संपूर्ण वापर हा जिल्ह्यासाठीच व्हावा ही जनतेची मागणी आहे.

----

...यासाठीच यशवंतरावांनी धरणाची स्थापना केली

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी आहे. त्या ठिकाणी बारमाही पाण्याच्या पाळ्या मिळाव्या यासाठीच स्व.यशवंतराव चव्हाण यांनी धरणाची स्थापनाच केली आहे; परंतु सध्या उजनीच्या सर्व वाटपातून नियोजनातून फक्त चार महिने पाण्याच्या पाळ्या उजनीतून सोलापूर जिल्ह्यात मिळत आहे. जर का धरणाची उंची दोन मीटरने वाढवली तर १२ महिने पाण्याच्या पाळ्या मिळण्याच्या उद्देशाने जे धरण बांधले होते ते किमान सोलापूर जिल्ह्याला ८ महिने तरी शेतकरी व कष्ठकरी जनतेला मिळतील. राजन पाटील दोन मीटर धरणाची उंची वाढवण्याची जी मागणी केली आहे. ती अतिशय स्वागतार्ह आहे. धरणाची भिंत २ मीटरने वाढवली तरी ती सोलापूरकरांच्या हितासाठीच वाढवावी. भविष्यात जर १२ टीएमसी पाणी वाढले तर इंदापूरकर अथवा बारामतीकरांचा किंवा आणखी कुणाचा उजनी धरणावर काही एक अधिकार नाही.

याबाबतचे सविस्तर निवेदन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

----

फोटो : सोमेश क्षीरसागर