शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे, बारामतीकरांसाठी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST

मोहोळ : उजनीच्या पाच टीएमसी पाण्याच्या निर्णयावरून मोहोळ तालुक्यात आता राजकीय रंग चढू लागला आहे. माजी आमदार ...

मोहोळ : उजनीच्या पाच टीएमसी पाण्याच्या निर्णयावरून मोहोळ तालुक्यात आता राजकीय रंग चढू लागला आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी धरणाची उंची वाढवू, इंदापूरला पाणी नेण्यास काहीच हरकत नाही, असे केलेल्या विधानावर शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांनी आक्षेप घेतला आहे. जरी धरणाची उंची वाढविली तरी ते पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे, बारामतीकरांसाठी नाही असा आरोप केला आहे. सोमेश क्षीरसागर म्हणाले, माजी आमदार राजन पाटील यांनी सर्वच वर्तमानपत्रांना सांगितले की, उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी नेण्यास आमचा विरोध आहे. कारण हे पाणी नेले तर शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय होईल. त्यांच्या या वक्तव्याचा अभिमान वाटला; परंतु त्यांनी सांगितले की, १९९३ रोजी मंत्रिमंडळातील निर्णयानुसार धरणाची उंची २ मीटरने वाढवली तर धरणात १२ टीएमसी पाण्याची वाढ होईल. त्यामुळे ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेता येईल. म्हणजे १२ टीएमसी पाण्याची अतिरिक्त वाढ झाली तर ५ टीएमसी इंदापूरला व राहिलेले ७ टीएमसी पाणी कर्जत जामखेडला जावू शकते, असा आरोप करत उजनीचे धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठीच आहे आणि त्याचा वापर सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या व शेतकरी कष्ठकरी जनतेच्या हक्काचे आहे. त्याचा संपूर्ण वापर हा जिल्ह्यासाठीच व्हावा ही जनतेची मागणी आहे.

----

...यासाठीच यशवंतरावांनी धरणाची स्थापना केली

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी आहे. त्या ठिकाणी बारमाही पाण्याच्या पाळ्या मिळाव्या यासाठीच स्व.यशवंतराव चव्हाण यांनी धरणाची स्थापनाच केली आहे; परंतु सध्या उजनीच्या सर्व वाटपातून नियोजनातून फक्त चार महिने पाण्याच्या पाळ्या उजनीतून सोलापूर जिल्ह्यात मिळत आहे. जर का धरणाची उंची दोन मीटरने वाढवली तर १२ महिने पाण्याच्या पाळ्या मिळण्याच्या उद्देशाने जे धरण बांधले होते ते किमान सोलापूर जिल्ह्याला ८ महिने तरी शेतकरी व कष्ठकरी जनतेला मिळतील. राजन पाटील दोन मीटर धरणाची उंची वाढवण्याची जी मागणी केली आहे. ती अतिशय स्वागतार्ह आहे. धरणाची भिंत २ मीटरने वाढवली तरी ती सोलापूरकरांच्या हितासाठीच वाढवावी. भविष्यात जर १२ टीएमसी पाणी वाढले तर इंदापूरकर अथवा बारामतीकरांचा किंवा आणखी कुणाचा उजनी धरणावर काही एक अधिकार नाही.

याबाबतचे सविस्तर निवेदन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

----

फोटो : सोमेश क्षीरसागर