शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे, बारामतीकरांसाठी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST

मोहोळ : उजनीच्या पाच टीएमसी पाण्याच्या निर्णयावरून मोहोळ तालुक्यात आता राजकीय रंग चढू लागला आहे. माजी आमदार ...

मोहोळ : उजनीच्या पाच टीएमसी पाण्याच्या निर्णयावरून मोहोळ तालुक्यात आता राजकीय रंग चढू लागला आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी धरणाची उंची वाढवू, इंदापूरला पाणी नेण्यास काहीच हरकत नाही, असे केलेल्या विधानावर शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांनी आक्षेप घेतला आहे. जरी धरणाची उंची वाढविली तरी ते पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे, बारामतीकरांसाठी नाही असा आरोप केला आहे. सोमेश क्षीरसागर म्हणाले, माजी आमदार राजन पाटील यांनी सर्वच वर्तमानपत्रांना सांगितले की, उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी नेण्यास आमचा विरोध आहे. कारण हे पाणी नेले तर शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय होईल. त्यांच्या या वक्तव्याचा अभिमान वाटला; परंतु त्यांनी सांगितले की, १९९३ रोजी मंत्रिमंडळातील निर्णयानुसार धरणाची उंची २ मीटरने वाढवली तर धरणात १२ टीएमसी पाण्याची वाढ होईल. त्यामुळे ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेता येईल. म्हणजे १२ टीएमसी पाण्याची अतिरिक्त वाढ झाली तर ५ टीएमसी इंदापूरला व राहिलेले ७ टीएमसी पाणी कर्जत जामखेडला जावू शकते, असा आरोप करत उजनीचे धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठीच आहे आणि त्याचा वापर सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या व शेतकरी कष्ठकरी जनतेच्या हक्काचे आहे. त्याचा संपूर्ण वापर हा जिल्ह्यासाठीच व्हावा ही जनतेची मागणी आहे.

----

...यासाठीच यशवंतरावांनी धरणाची स्थापना केली

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी आहे. त्या ठिकाणी बारमाही पाण्याच्या पाळ्या मिळाव्या यासाठीच स्व.यशवंतराव चव्हाण यांनी धरणाची स्थापनाच केली आहे; परंतु सध्या उजनीच्या सर्व वाटपातून नियोजनातून फक्त चार महिने पाण्याच्या पाळ्या उजनीतून सोलापूर जिल्ह्यात मिळत आहे. जर का धरणाची उंची दोन मीटरने वाढवली तर १२ महिने पाण्याच्या पाळ्या मिळण्याच्या उद्देशाने जे धरण बांधले होते ते किमान सोलापूर जिल्ह्याला ८ महिने तरी शेतकरी व कष्ठकरी जनतेला मिळतील. राजन पाटील दोन मीटर धरणाची उंची वाढवण्याची जी मागणी केली आहे. ती अतिशय स्वागतार्ह आहे. धरणाची भिंत २ मीटरने वाढवली तरी ती सोलापूरकरांच्या हितासाठीच वाढवावी. भविष्यात जर १२ टीएमसी पाणी वाढले तर इंदापूरकर अथवा बारामतीकरांचा किंवा आणखी कुणाचा उजनी धरणावर काही एक अधिकार नाही.

याबाबतचे सविस्तर निवेदन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

----

फोटो : सोमेश क्षीरसागर