शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ३५ गावांचा पाणीप्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:21 IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगाव व मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या ...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगाव व मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर खासदार जयसिद्धेश्वर महाराज, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजप नेत्या चित्रा वाघ, आमदार प्रशांत परिचारक, माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, धैर्यशील मोहिते-पाटील, माजी मंत्री राम शिंदे, आमदार राम सातपुते, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रा. बी.पी. रोंगे, नामदेव जानकर, बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आजपर्यंत पाणी देतो म्हणून अनेक भूलथापा देऊन हे निवडून आले होते. पण पाणी काही मिळाले नाही. निवडणूक आली की कोणता तर बनावट कागद दाखवून फसवणूक करून मते मिळवली. सामाजिक कार्याची आवड, मेहनती संघर्ष करणारा नेता म्हणून समाधान आवताडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आता दामाजीच्या मागे पांडुरंग उभा असल्याने समाधान आवताडे यांचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.

गेल्या दीड वर्षात या सरकारचे नाव बदलून महावसुली आघाडी नाव झाले आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ अशी या सरकारमधील मंत्र्यांची कामे आहेत.

कोरोनाकाळात राज्यातील नागरिकांना एकाही रुपयांची मदत ठाकरे सरकारने केली नाही. जे मुख्यमंत्री बांधावर जाऊन सांगत होते हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळवून देऊ. पण या सरकारने कवडीमोल मदत केली. सावकारी पद्धतीने वीजबिलाची शेतकऱ्यांकडून वसुली केली. थकबाकीच्या नावाखाली यांनी शेतकऱ्यांची वीज कट केली, ट्रान्स्फर उचलून नेल्याचे पाप यांनी केले असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कारखान्याचा मोबदला घेतात; मग सभासदत्व रद्द कसे : आवताडे

ही निवडणूक विधानसभेची आहे. पण विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून ते कारखान्याविषयी बोलत आहेत. या मतदारसंघात विरोधकांनी कोणती विकासाची कामे केली, ते सांगावे.

विरोधक दामाजीच्या सभासदांवर बोलत आहेत, अफवा पसरवत आहेत. पण दामाजीच्या एकाही सभासदाचे सदस्यत्व रद्द होणार नाही. कारखान्याचा मोबदला सर्व सभासद घेत आहेत. मग सभासत्व रद्द कसे होईल, असा प्रश्न उमेदवार समाधान आवताडे यांनी उपस्थित केला.