शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

नदीकाठच्या ५१ गावांच्या पिकात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:23 IST

अक्कलकोट : तुळजापूर व अक्कलकोट तालुक्यांत परतीच्या मुसळधार पावसाने दैना उडवून दिली आहे. परिणामत: कुरनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी ...

अक्कलकोट : तुळजापूर व अक्कलकोट तालुक्यांत परतीच्या मुसळधार पावसाने दैना उडवून दिली आहे. परिणामत: कुरनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे हजारो हेक्टरमधील तूर, ऊस, उडीद, केळी ही पिके पाण्यात कुजत असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. नैसर्गिक फटका बसण्याचे यंदा दुसरे वर्ष आहे. या नैसर्गिक संकटापुढे नदीकाठच्या ५१ गावांतील बळिराजा हतबल झाला आहे.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही परतीच्या पावसाने धुमाकूळ घातले आहे. कधी अक्कलकोट, तर कधी तुळजापूर तालुका मुसळधार पावसाचा अनुभव घेत आहे. यामुळे कुरनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होत आहे. परिणामी बोरी नदीपात्रात रोज १८००-२०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. याचा अंदाज नेमकं पाटबंधारे विभागाला लागताना दिसत नाही. नदी वारंवार दुथडी भरून वाहते आहे. परिणामी रात्रंदिवस नदीकाठच्या शेतकऱ्यांचे शेतातील ऊस, तूर, उडीद, केळी, सोयाबीन ही पिके पाण्यात थांबून आहेत. यामुळे पिके कुजत आहेत. बळिराजा चिंतातुर झाला आहे.

महसूल विभागाकडून पिकांचे पंचनामे होण्यासाठी एकाच दिवसांत सलग ६५ मिलिमीटर पाऊस होणे नियमाने बंधनकारक आहे. असे जरी असले तरी तुळजापूर तालुक्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे येथील पावसाच्या पाण्यात गृहीत धरले जाते की नाही ? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.

---

या गावाला सर्वाधिक धोका

मोठ्याळ, चुंगी, किणी, पितापूर, सांगवी, ममनाबद, निमगाव, काळेगाव, गौडगाव खुर्द, रामपूर, उमरगे, कंठेहळळी, मिरजगी, बिंजगेर, संगोगी (ब.), रुद्देवाडी, आंदेवाडी(ज.), बबलाद,

---अक्कलकोट तालुक्यात परतीचा मुसळधार पाऊस आहे. तसेच तुळजापूर तालुक्यातसुद्धा पाऊस होत आहे. यामुळे कुरनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होत आहे. नदीपात्रात १८००-२००० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनसुद्धा सतत सतर्क झाले आहे. वरिष्ठांच्या सूचनेनंतर नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील.

- बाळासाहेब सिरसाट

तहसीलदार

----

फोटो : २६ ममदाबाद

ममनाबद येथील सोयाबीन पीक परतीच्या पावसाच्या पाण्यात कुजत आहे.