शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सांगोला तालुक्यातील ८२ गावांवर ओढावणार जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST

सांगोला तालुक्यातील ८२ गावांसाठी आशिया खंडात सर्वात मोठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना २००२ नंतर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. ...

सांगोला तालुक्यातील ८२ गावांसाठी आशिया खंडात सर्वात मोठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना २००२ नंतर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. तेव्हापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ठेकेदारामार्फत ही योजना चालवली जात आहे. त्यांची मुदत गतवर्षी मार्च २०२० ला संपली होती. त्यामुळे पंचायत समिती सभापती राणी कोळवले यांनी १२ जून २०२० रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनेच ही योजना पुढे ३ वर्षे चालवावी असा ठराव करून तो त्यांना पाठवून दिला होता. तद‌्नंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ही योजना चालवण्यासाठी निविदा काढली असून त्याची मुदत १२ नोव्हेंबर २०२१ ला संपणार आहे. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने १५ जुलैपर्यंतच योजना चालविण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही योजना कोण चालवणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अशातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेने १ ते ७ जूनपर्यंत ही योजना बंद ठेवली होती. योजना बंद असल्याची दखल घेऊन आ. शहाजीबापू पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून ही योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनेच चालवावी अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी योजना चालवण्यासाठी सुरुवात केली असताना अचानक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधीक्षक अभियंता मुंबई यांनी १५ जुलैपर्यंत योजना चालवावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांना कळविले आहे.

जलसंकटाला तोंड द्यावे लागणार

वीज वितरण कंपनीकडून या योजनेच्या वार्षिक ३ कोटी ५० रुपये वीज बिलात ५० टक्के सवलत देऊन १ कोटी ५० लाख रुपये परतावा दिला तरी सुमारे २ कोटी रुपये कोठून उपलब्ध करायचे म्हणून सोलापूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ही योजना तोट्यात असल्यामुळे चालविण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. त्यामुळे आ. शहाजीबापू पाटील यांनाच आता पाणीपुरवठा मंत्र्याकडे ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेने चालवावी की ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे चालवायला द्यायची, यासाठी तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत. अन्यथा १५ जुलैनंतर सांगोला तालुक्याला जलसंकटाला तोंड द्यावे लागणार, हे मात्र निश्चित.

जीएसटी वगळता ५ कोटी ६० लाखांचा खर्च

शिरभावी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला ग्रामपंचायतीकडून पाणी मागणीनुसार सुमारे १ कोटी ८० लाख रुपये उत्पन्न मिळते. तर सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये वीज बिल, ठेकेदाराकडून ही योजना चालण्यासाठी वर्षाकाठी १ कोटी २० लाख रुपये, तुरटी, टीसीएल पावडर १५ लाख रुपये, पाटबंधारे विभाग २७ लाख रुपये पाणीपट्टीसह इतर असे वर्षाकाठी सुमारे ५ कोटी ६० लाख (जीएसटी) वगळून खर्च येतो. उत्पन्न वजा जाता इतर निधी कोठून उपलब्ध करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य अंधारातच आहे.

फोटो ओळ :::::::::::::::::::

शिरभावीसह ८२ गावच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे संग्रहित छायाचित्र.