शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला तालुक्यातील ८२ गावांवर ओढावणार जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST

सांगोला तालुक्यातील ८२ गावांसाठी आशिया खंडात सर्वात मोठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना २००२ नंतर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. ...

सांगोला तालुक्यातील ८२ गावांसाठी आशिया खंडात सर्वात मोठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना २००२ नंतर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. तेव्हापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ठेकेदारामार्फत ही योजना चालवली जात आहे. त्यांची मुदत गतवर्षी मार्च २०२० ला संपली होती. त्यामुळे पंचायत समिती सभापती राणी कोळवले यांनी १२ जून २०२० रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनेच ही योजना पुढे ३ वर्षे चालवावी असा ठराव करून तो त्यांना पाठवून दिला होता. तद‌्नंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ही योजना चालवण्यासाठी निविदा काढली असून त्याची मुदत १२ नोव्हेंबर २०२१ ला संपणार आहे. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने १५ जुलैपर्यंतच योजना चालविण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही योजना कोण चालवणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अशातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेने १ ते ७ जूनपर्यंत ही योजना बंद ठेवली होती. योजना बंद असल्याची दखल घेऊन आ. शहाजीबापू पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून ही योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनेच चालवावी अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी योजना चालवण्यासाठी सुरुवात केली असताना अचानक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधीक्षक अभियंता मुंबई यांनी १५ जुलैपर्यंत योजना चालवावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांना कळविले आहे.

जलसंकटाला तोंड द्यावे लागणार

वीज वितरण कंपनीकडून या योजनेच्या वार्षिक ३ कोटी ५० रुपये वीज बिलात ५० टक्के सवलत देऊन १ कोटी ५० लाख रुपये परतावा दिला तरी सुमारे २ कोटी रुपये कोठून उपलब्ध करायचे म्हणून सोलापूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ही योजना तोट्यात असल्यामुळे चालविण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. त्यामुळे आ. शहाजीबापू पाटील यांनाच आता पाणीपुरवठा मंत्र्याकडे ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेने चालवावी की ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे चालवायला द्यायची, यासाठी तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत. अन्यथा १५ जुलैनंतर सांगोला तालुक्याला जलसंकटाला तोंड द्यावे लागणार, हे मात्र निश्चित.

जीएसटी वगळता ५ कोटी ६० लाखांचा खर्च

शिरभावी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला ग्रामपंचायतीकडून पाणी मागणीनुसार सुमारे १ कोटी ८० लाख रुपये उत्पन्न मिळते. तर सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये वीज बिल, ठेकेदाराकडून ही योजना चालण्यासाठी वर्षाकाठी १ कोटी २० लाख रुपये, तुरटी, टीसीएल पावडर १५ लाख रुपये, पाटबंधारे विभाग २७ लाख रुपये पाणीपट्टीसह इतर असे वर्षाकाठी सुमारे ५ कोटी ६० लाख (जीएसटी) वगळून खर्च येतो. उत्पन्न वजा जाता इतर निधी कोठून उपलब्ध करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य अंधारातच आहे.

फोटो ओळ :::::::::::::::::::

शिरभावीसह ८२ गावच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे संग्रहित छायाचित्र.