शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेच्या पात्रात पाणी पोहोचले

By admin | Updated: July 6, 2014 01:26 IST

स्नानाची सोय; खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने पात्र बनले धोकादायक

पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या स्नानाची सोय व्हावी, यासाठी उजनी धरणातून ३ हजार क्युसेक्स पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात आले असून, हे पाणी चंद्रभागा नदीपात्रामध्ये दाखल झाले आहे. यामुळे वारकऱ्यांना स्नान करणे सोयीचे झाले आहे.सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर पालखी सोहळा आल्यानंतर पंढरीत मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी झाली होती. काही वारकरी आषाढी आधी पंढरीत येऊन स्नान व दर्शन करून वारीत जाण्यासाठी पालख्यांना सामोरे जात होते; मात्र चंद्रभागा वाळवंटात पाणीच नसल्याने डबक्यात साचलेल्या पाण्यामध्ये त्यांना स्नान करावे लागत होते. यामुळे प्रशासनाने बुधवारी उजनी धरणातून तीन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडला असून, हे पाणी वाळू उपशाचे खड्डे व कोरड्या नदीतील भेगा भरत गुरसाळे, पंढरपूर बंधारा ओलांडून नवीन पूल, जुना दगडी पूल पार करून शनिवारी पहाटेच्या सुमारास चंद्रभागा वाळवंटात दाखल झाले आहे. यामुळे भाविकांना स्नान करणे सुलभ झाले असून, पाणी वाढत असल्याने होडीचालकांचीही मोठ्या प्रमाणात लगबग वाढली आहे.चंद्रभागा नदीमध्ये पाणी नसल्याने वाळू उपसा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचणार असल्याने स्नानासाठी नदीपात्रात जाणाऱ्या भाविकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने धोका पत्करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे प्रशासनाने पाणी येण्याआधीच वारकऱ्यांना याबाबत जनजागृती करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. ---------------------हळूहळू पाणी येऊ लागलेआठ ते दहा दिवसांपासून चंद्रभागा वाळवंटात पाणीच नव्हते. आता उजनीतून पाणी येत असून, हे पाणी पंढरपूर बंधाऱ्यातून हळूहळू सोडण्यात येत आहे. यामुळे चंद्रभागा नदीपात्रामध्ये पडलेले खड्डे भरून हे पाणी गोपाळपूरच्या दिशेने पुढे सरकत असून, वाळवंटात असलेल्या होडी चालविण्यासाठी होडीचालकांची लगबग सुरू झाली आहे.