शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

‘त्या’ धोकादायक रस्त्यासाठी आमदारांचा थेट कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:21 IST

सध्या या ठिकाणाहून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकांना अपघातालाही सामोरे जावे लागते. ऊस वाहतूक, मालवाहतूक प्रवाशांच्या ...

सध्या या ठिकाणाहून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकांना अपघातालाही सामोरे जावे लागते. ऊस वाहतूक, मालवाहतूक प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नाही. या प्रश्नाबाबत नुकतेच आमदार राम सातपुते यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने कामे पूर्ण करा अन्यथा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नुकताच दिला आहे.

या महामार्गाचे काम सुरू होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते सुस्थितीत तयार झाले आहेत.

पाटील वस्ती (अकलूज) येथील रस्ता मात्र उखडलेल्या स्थितीत असून, तीव्र उतार असल्यामुळे एकेरी वाहतूक करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. उन्हाळ्यात धुळीचे, तर पावसाळ्यात निसरड्या रस्त्याचा सामना ही बाब नित्याची झाली आहे. सध्या उसाची वाहतूक या रस्त्याने सुरू असल्यामुळे आणखीन धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यासाठी आणखी किती दिवस प्रवाशांचा जीव टांगणीला लावला जाणार असल्याचा संतप्त सवाल प्रवाशांमधून येत आहे.

---

रस्त्यावर विजेचे खांब जैसे थे!

रस्त्यावर अनेक ठिकाणी विजेचे धोकादायक खांब जैसे येथे आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाला काम करून घेण्यासाठी वारंवार विनंती करूनही रस्ते विकास महामंडळ दुर्लक्ष करत आहे. यामुळे आमदार सातपुते यांनी याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे.