शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

वारकरी संप्रदायाचे पवारांना साकडे

By admin | Updated: May 31, 2014 00:45 IST

मागण्या पूर्ण होतील : वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाला पवार यांची ग्वाही

सांगोला : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारकरी सांप्रदायने आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी २ जूनला शासनाला निवेदन सादर करावे. यामुळे पालखी सोहळ्याच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही, या दृष्टीने अधिवेशनानंतर बैठकीच्या माध्यमातून सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन शरद पवार यांनी वारकरी सांप्रदायच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी सांगोल्यात दिले. या बैठकीत बोलताना विठ्ठल-रुक्मिणीच्या नित्यपूजेसाठी स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे, असा आग्रह आ.भारत भालके यांनी केला. ज्या ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असे राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी सांगितले़ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी वारकरी सांप्रदायचे चार प्रतिनिधी घेऊन दर तीन महिन्यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आढावा घेऊन चर्चा झाली पाहिजे, असे आ.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी मत मांडले. नरहरी महाराज चौधरी म्हणाले, शासनाकडे सतत संपर्क साधूनही आमच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही, म्हणून शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले़ वारकरी सांप्रदायचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल पाटील यांचे नाव सर्वानुमते निश्चित केले आहे.

-----------------------------

वारकर्‍यांच्या प्रमुख मागण्या

प्रत्येक मुक्कामी ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था व पाणी, वीज, शौचालयाची सोय करणे़ देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे चौपदरीकरण करणे १० वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची रखडलेली कामे पूर्ण व्हावीत़ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती गठित करताना वारकरी प्रतिनिधीला नेमावे़ तसेच पुण्यामध्ये वारकरी भवन असावे. विठ्ठल-रुक्मिणीच्या पुजार्‍यासंदर्भात समितीने आततायीने निर्णय घेऊ नये़ शासनाचे धोरण उदासीन शासनाचे पालखी सोहळ्याबाबत धोरण उदासीन असून, निधीची पूर्तता केली जाते. मात्र प्रत्यक्षात कामावर निधीच खर्च केला जात नाही, असा तक्रारींचा पाढा वारकरी प्रतिनिधींनी वाचला.

---------------------------------

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन अधांतरीच !

माळशिरस, नातेपुते, सदाशिवनगर या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो. या ठिकाणी मात्र पालखी तळासाठी जागा पूर्तता केली आहे. मात्र इतर ठिकाणी पालखीच्या मुक्कामाबाबत जागांची निश्चिती केली नसल्यामुळे वारकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारकरी सांप्रदायने शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या अडीच वर्षांत काहीच केले नाही, उलट मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.

------------------------------

ज्याठिकाणी पालखीचा मुक्काम केला जातो तेथील परिसरात ५० ते ५५ एकराचे क्षेत्र आरक्षित केले पाहिजे. त्या क्षेत्राला वॉलकंपाउंड करुन पालखीच्या एक दिवसाच्या मुक्कामानंतर या जागा एखाद्या शाळेच्या क्रीडांगणासाठी वापरास देऊन नियोजन केले पाहिजे. -अण्णासाहेब डांगे, अध्यक्ष, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

----------------------------

मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त व पालकमंत्री अशा तीन वेगवेगळ्या कमिट्यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्याच्या अडचणी, समस्यांबाबत बैठका घेण्याऐवजी एकाच अधिकार्‍याला नियुक्त करुन समस्या सोडवल्या पाहिजेत. -विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार

---------------------------

शिष्टमंडळातील मान्यवर वारकरी महामंडळाचे सचिव नरहरी महाराज चौधरी, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, भाऊसाो महाराज पाटील, विठ्ठल महाराज देहूकर, राजेंद्र महाराज मोरे़