शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

वारकरी संप्रदायाचे पवारांना साकडे

By admin | Updated: May 31, 2014 00:45 IST

मागण्या पूर्ण होतील : वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाला पवार यांची ग्वाही

सांगोला : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारकरी सांप्रदायने आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी २ जूनला शासनाला निवेदन सादर करावे. यामुळे पालखी सोहळ्याच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही, या दृष्टीने अधिवेशनानंतर बैठकीच्या माध्यमातून सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन शरद पवार यांनी वारकरी सांप्रदायच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी सांगोल्यात दिले. या बैठकीत बोलताना विठ्ठल-रुक्मिणीच्या नित्यपूजेसाठी स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे, असा आग्रह आ.भारत भालके यांनी केला. ज्या ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असे राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी सांगितले़ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी वारकरी सांप्रदायचे चार प्रतिनिधी घेऊन दर तीन महिन्यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आढावा घेऊन चर्चा झाली पाहिजे, असे आ.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी मत मांडले. नरहरी महाराज चौधरी म्हणाले, शासनाकडे सतत संपर्क साधूनही आमच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही, म्हणून शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले़ वारकरी सांप्रदायचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल पाटील यांचे नाव सर्वानुमते निश्चित केले आहे.

-----------------------------

वारकर्‍यांच्या प्रमुख मागण्या

प्रत्येक मुक्कामी ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था व पाणी, वीज, शौचालयाची सोय करणे़ देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे चौपदरीकरण करणे १० वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची रखडलेली कामे पूर्ण व्हावीत़ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती गठित करताना वारकरी प्रतिनिधीला नेमावे़ तसेच पुण्यामध्ये वारकरी भवन असावे. विठ्ठल-रुक्मिणीच्या पुजार्‍यासंदर्भात समितीने आततायीने निर्णय घेऊ नये़ शासनाचे धोरण उदासीन शासनाचे पालखी सोहळ्याबाबत धोरण उदासीन असून, निधीची पूर्तता केली जाते. मात्र प्रत्यक्षात कामावर निधीच खर्च केला जात नाही, असा तक्रारींचा पाढा वारकरी प्रतिनिधींनी वाचला.

---------------------------------

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन अधांतरीच !

माळशिरस, नातेपुते, सदाशिवनगर या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो. या ठिकाणी मात्र पालखी तळासाठी जागा पूर्तता केली आहे. मात्र इतर ठिकाणी पालखीच्या मुक्कामाबाबत जागांची निश्चिती केली नसल्यामुळे वारकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारकरी सांप्रदायने शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या अडीच वर्षांत काहीच केले नाही, उलट मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.

------------------------------

ज्याठिकाणी पालखीचा मुक्काम केला जातो तेथील परिसरात ५० ते ५५ एकराचे क्षेत्र आरक्षित केले पाहिजे. त्या क्षेत्राला वॉलकंपाउंड करुन पालखीच्या एक दिवसाच्या मुक्कामानंतर या जागा एखाद्या शाळेच्या क्रीडांगणासाठी वापरास देऊन नियोजन केले पाहिजे. -अण्णासाहेब डांगे, अध्यक्ष, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

----------------------------

मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त व पालकमंत्री अशा तीन वेगवेगळ्या कमिट्यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्याच्या अडचणी, समस्यांबाबत बैठका घेण्याऐवजी एकाच अधिकार्‍याला नियुक्त करुन समस्या सोडवल्या पाहिजेत. -विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार

---------------------------

शिष्टमंडळातील मान्यवर वारकरी महामंडळाचे सचिव नरहरी महाराज चौधरी, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, भाऊसाो महाराज पाटील, विठ्ठल महाराज देहूकर, राजेंद्र महाराज मोरे़