शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कारखान्यांची गोदामे तुडुंब भरलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:22 IST

राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे प्रश्न आता अधिकच बिकट बनत चालले आहेत. त्यात विक्रीविना गोदामात साठलेली ...

राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे प्रश्न आता अधिकच बिकट बनत चालले आहेत. त्यात विक्रीविना गोदामात साठलेली साखर हा सर्वात गंभीर प्रश्न कारखानदारांना सतावत आहे. एकीकडे ऊस उत्पादक शेतकरी उसाच्या बिलासाठी कारखान्याकडे चकरा मारत आहेत, तर कारखानदार ही रक्कम देण्यासाठी बँकांचे दरवाजे ठोठावत आहेत; परंतु हा प्रश्न काही सुटता सुटेना.

कारखानदारीचे आर्थिक जुगाड जुळत नसल्याने साखर विक्रीची समस्या आता सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे.

केंद्र सरकारने साखर विक्रीसाठी किमान विक्री मूल्य (एमएसपी) प्रतिक्विंटल ३१०० रुपये निश्चित केले आहे. त्यापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्यास कारखान्यांना दंड आकारला जातो. मात्र, सध्या जागतिक बाजारात साखरेचे दर घसरले आहेत. साखर व्यापारी एमएसपीपेक्षा क्विंटलमागे २०० रुपये कमी दराने साखरेची मागणी करीत असल्याने विक्री कमालीची घटली आहे.

दुसरीकडे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा तगादा वाढल्याने मिळेल त्या दराने साखर विक्री करण्याची नामुष्की अनेक कारखान्यांवर आली आहे.

---------

असा ठरतो साखर विक्रीचा कोटा

हंगामात उत्पादित केलेल्या साखरेच्या प्रमाणात विक्रीसाठी कोटा निश्चित करून दिला जातो. एक लाख क्विंटल साखर उत्पादन झाल्यास दरमहा १२ हजार क्विंटल साखरेची विक्री करता येते. त्यात कमी-जास्त विक्री करता येत नाही. साहजिकच कारखानदार मिळेल त्या दराने साखर विकून शेतकऱ्यांना रकमा देण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यामुळे आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत आहे.

------

जिल्ह्यात ८० लाख साखर पोती साठा

सोलापूर जिल्ह्यात गतवर्षीच्या गळीत हंगामातील ३२ लाख क्विंटल साखर विक्रीविना गोदामात पडून राहिले आहे यंदाच्या हंगामाने त्यात भर टाकली आहे जागतिक मंदीमुळे अनेक कारखान्यांची साखर विकली गेली नाही. एमएसपी वाढवून मिळेल या आशेने कारखान्यांनी साखर न विकता तशीच ठेवली. ऊस बिलांसाठी कर्जाऊ रकमा घेतल्या आता साखर तशीच पडून राहिल्याने कर्जाचा डोंगर वाढला. हंगामा अखेर जिल्ह्यात ८० लाख पोती साखरेचा साठा आहे.

----------

जिल्ह्यातील साखर साठ्याची स्थिती

गतहंगामातील साखर साठा ३२ लाख ४५ हजार क्विं. नव्याने उत्पादित केलेली साखर ७७ लाख ३३ हजार क्विं. फेब्रुवारी २०२१ अखेर विक्री २६ लाख ५० हजार क्विं. शिल्लक साखर (फेब्रु.अखेर) ७९ लाख १५ हजार क्विं.

------

साखर विक्रीचा कोटा वाढत नाही तर कारखाने रकमा कोठून उपलब्ध करतील हा विचार होत नाही. कारखानदार सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यांची आर्थिक स्थिती आणि मनस्थिती बिघडणार नाही तर काय होईल.

-व्ही. पी. पाटील, चेअरमन

गोकुळ माऊली शुगर्स, तडवळ

-------