शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

वांगीकरांनी दिली सुरक्षारक्षकाच्या हाती सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST

तसं तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच वांगीही राजकीय वादात भाजून निघालेले गाव. गाव दुष्काळाने होरपळत होते अन् विहिरींना टिपूसभरही पाणी नव्हते. ...

तसं तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच वांगीही राजकीय वादात भाजून निघालेले गाव. गाव दुष्काळाने होरपळत होते अन् विहिरींना टिपूसभरही पाणी नव्हते. संपूृर्ण शिवार उजाड पडले होते. परिस्थिती बदलण्यासाठी गावकऱ्यांनी ‘सत्यमेव जयते वाॅटर कप’ स्पर्धेत सहभाग घेतला अन् बघता-बघता उत्तर तालुक्यात वांगीचे काम सरस ठरले. त्यामुळे २०१८ मध्ये वांगीचा तालुक्यात प्रथम क्रमांकाने गौरव झाला. मात्र, मिळालेल्या पैशातून गावाच्या विकासाला दिशा काही मिळत नव्हती.

३०-३५ वर्षे गावावर एकहाती सत्ता असलेल्या पाटील कुटुंबानेच राजकीय विरोधकाच्या हाती २०१५ मध्ये गावचा कारभार सोपविला होता. मात्र, विकास कामात पाटील व सरपंचांचे एकमत होत नव्हते. विकास कामांचा रुतलेला गाडा पुढे घेऊन जाण्यासाठी पाटील गटाची ३५ वर्षांची सत्ता गावकऱ्यांनी घालविली.

मराठा बटालियनमध्ये २१ वर्षे हवालदार म्हणून काम केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या आबासाहेब अवताडे यांच्याकडे एकहाती सत्ता गावकऱ्यांनी दिली आहे. मेजर म्हणून ओळख असलेले अवताडे चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीत सुरक्षा रक्षकाची सेवा बजावत होते.

मोफत पिठाची गिरणी..

पहिले काम हे कर भरणाऱ्या गावकऱ्यांसाठी मोफत पिठाची गिरणी सुरू केली जाईल, असे आबासाहेब अवताडे यांनी सांगितले. रस्ते, गटारी व जाहीरनाम्यातील कामे तर करायचीच आहेत, असे आवताडे म्हणाले. पाणी फाउंडेशनच्या रकमेतून कोणती कामे करायची ते बैठक घेऊन ठरविण्यात येईल, असे अवताडे यांनी सांगितले.

----