शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

बळिराजाला ‘वळीवा’ची प्रतिक्षा अन् धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

पावसाच्या आगमनावर कृषी व्यवसायाची मोठी भिस्त आहे. वेळेवर पाऊस पडला तर साहाजिकच उत्पादन वाढते. त्यामुळे बळिराजाला मान्सूनपूर्व पडणाऱ्या वळवाच्या ...

पावसाच्या आगमनावर कृषी व्यवसायाची मोठी भिस्त आहे. वेळेवर पाऊस पडला तर साहाजिकच उत्पादन वाढते. त्यामुळे बळिराजाला मान्सूनपूर्व पडणाऱ्या वळवाच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला हा पाऊस वाऱ्यामुळे झाडं, पिकं झोपवतो, गारपीट होते. विजा पाडून बळीसुद्धा घेतो. त्यामुळे वळवाच्या पावसाची शेतकऱ्याला प्रतीक्षा असली तरीही धास्ती मात्र कायम आहे.

थोडी खुशी, थोडा गम

रोहिणी नक्षत्रापूर्वीच्या टप्प्यात अवकाळी म्हणजेच ‘वळीव’ हा पाऊस बेधुंद, बेफाम, कमी वेळेत पडणारा तर कधी-कधी वर्षभर पुरेल एवढं पाणी देऊन जातो. कोणत्याही दिशेने, वाकडा, तिरका, चौखूर उधळत येणाऱ्या पावसासाठी उन्हाळ्यापूर्वी नांगरटी करून ठेवलेल्या जमिनी मात्र या पावसाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या असतात. या तापलेल्या शिवारात पावसाचे आगमन होताच विशिष्ट गंधाची दरवळ मन मोहून टाकणारी असते. अशा अवकाळी पावसामुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना मोठं नुकसानही सोसावं लागतं. सहाजिकच या पावसामुळे ‘थोडी खुशी, थोडा गम’ दिसून येतो.

कोट

::::::::::::::::

वळवाचा चांगला पाऊस पडला तर पाणी पातळीही वाढते, तापलेल्या जमिनींची पाण्याची भूक भागते. त्यामुळे पुढल्या काळात कमी जास्ती पाऊस पडला तरीही शेतातील पिके हाती लागतात. मात्र, या पावसाबरोबर गारा व वादळाने शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या पावसाची धास्ती लागून राहते.

- देवीदास ढोपे

पुरंदावडे

फोटो ::::::::::::::::::::::::::

ग्रामीण भागात दिसणारी वावटळ