शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

बळिराजाला ‘वळीवा’ची प्रतिक्षा अन् धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

पावसाच्या आगमनावर कृषी व्यवसायाची मोठी भिस्त आहे. वेळेवर पाऊस पडला तर साहाजिकच उत्पादन वाढते. त्यामुळे बळिराजाला मान्सूनपूर्व पडणाऱ्या वळवाच्या ...

पावसाच्या आगमनावर कृषी व्यवसायाची मोठी भिस्त आहे. वेळेवर पाऊस पडला तर साहाजिकच उत्पादन वाढते. त्यामुळे बळिराजाला मान्सूनपूर्व पडणाऱ्या वळवाच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला हा पाऊस वाऱ्यामुळे झाडं, पिकं झोपवतो, गारपीट होते. विजा पाडून बळीसुद्धा घेतो. त्यामुळे वळवाच्या पावसाची शेतकऱ्याला प्रतीक्षा असली तरीही धास्ती मात्र कायम आहे.

थोडी खुशी, थोडा गम

रोहिणी नक्षत्रापूर्वीच्या टप्प्यात अवकाळी म्हणजेच ‘वळीव’ हा पाऊस बेधुंद, बेफाम, कमी वेळेत पडणारा तर कधी-कधी वर्षभर पुरेल एवढं पाणी देऊन जातो. कोणत्याही दिशेने, वाकडा, तिरका, चौखूर उधळत येणाऱ्या पावसासाठी उन्हाळ्यापूर्वी नांगरटी करून ठेवलेल्या जमिनी मात्र या पावसाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या असतात. या तापलेल्या शिवारात पावसाचे आगमन होताच विशिष्ट गंधाची दरवळ मन मोहून टाकणारी असते. अशा अवकाळी पावसामुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना मोठं नुकसानही सोसावं लागतं. सहाजिकच या पावसामुळे ‘थोडी खुशी, थोडा गम’ दिसून येतो.

कोट

::::::::::::::::

वळवाचा चांगला पाऊस पडला तर पाणी पातळीही वाढते, तापलेल्या जमिनींची पाण्याची भूक भागते. त्यामुळे पुढल्या काळात कमी जास्ती पाऊस पडला तरीही शेतातील पिके हाती लागतात. मात्र, या पावसाबरोबर गारा व वादळाने शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या पावसाची धास्ती लागून राहते.

- देवीदास ढोपे

पुरंदावडे

फोटो ::::::::::::::::::::::::::

ग्रामीण भागात दिसणारी वावटळ