शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

विठ्ठल कारखान्याची ६६ हजार ६४६ पोती साखर चोरून विकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST

पंढरपूर येथे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील बोलत होते. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा त्यांनी भांडाफोड ...

पंढरपूर येथे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील बोलत होते. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा त्यांनी भांडाफोड केला आहे.

पुढे पाटील म्हणाले, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला २०१८-१९, १९-२०, २०-२१ या तीन वर्षात कोणकोणत्या बँकेकडून कर्ज मंजूर झाले आहे? किती कर्ज उचलले आहे त्याचा वापर कुठे कुठे केला आहे? कोणकोणत्या संचालक व त्यांच्या नातेवाइकांकडे किती कर्ज आहे. त्या कर्जाच्या वसुलीबाबत काय कारवाई केली. चार वर्षांमध्ये तोडणी वाहतूकदारांची किती देय थकले आहे. ते देय कधी देणार, यासाठी कुठून पैसे उपलब्ध होणार? कर्मचाऱ्यांची किती महिन्याचे पगार करणे बाकी आहे, ती रक्कम किती आहे. पगार देणेबाबत काय तरतूद केली आहे?

३१ मार्च २० व ३१ मार्च २०२१ अखेरच्या हिशेबाचे ताळेबंद पत्रक व १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीच्या नफा-तोटा पत्रक यावर सविस्तरपणे माहिती देण्यात यावी. या कालावधीत तोटा झाला असल्यास कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांच्या जमिनीवर झालेल्या तोटाच या रकमेचा बोजा सोडून द्यावा, असा ठराव मंजूर करण्यात यावा.

२०१९-२० या आर्थिक वर्षात किती भंगार विक्री केले. किती दराने विक्री केली व कोणास केली आहे. या भंगार विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे, त्यामुळे सविस्तर चौकशी झाल्याशिवाय नोंद घेऊन मंजुरी देऊ नये, असा ठराव करावा.

यासह संस्थेने सन २०१९-२० व २०२०-२१ यापूर्वी बाहेरून किती निधी उभारला आहे, त्याची परतफेड केली आहे का? याची सविस्तर माहिती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत द्यावी.

त्याचबरोबर भ्रष्ट कारभार करणाऱ्या चेअरमन, व्हाइस चेअरमनसह संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतचा ठराव कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात यावा, अशी मागणी अभिजित पाटील यांनी केली आहे.

:: कारखाना तोट्यात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ::::

विठ्ठल कारखान्यास १११ कोटी नऊ लाख ४४४० रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यातून ऊसबिलाची ६२ कोटी २२ लाख ७१,३५० रुपये पूर्ण दिल्यानंतरदेखील ४८ कोटी ८६ लाख ३३,०९० रुपये शिल्लक राहत आहेत. तीन लाख ३५४७ मे. टन ६५० प्रतितोडणीप्रमाणे वाहतुकीचा खर्च १९ कोटी ७३ लाख ५५५० रुपये द्यायला पाहिजे होता. तरीदेखील अंदाजे ४८ कोटी ८६ लाख ३३०९० रुपये पैकी १९ कोटी ७३ लाख ५५५० दिले तरी २९ कोटी १३ लाख २७५४० रुपये शिल्लक राहतात. कर्मचारी पगार महिना एक कोटीप्रमाणे धरून १२ कोटी रुपये शिल्लक रक्कमेतून अदा करायला पाहिजे होता. शिल्लक रुपयांपैकी १२ कोटी रुपये पगार देऊनही १७ कोटी १३ लाख २७ हजार ५४० रुपये शिल्लक राहतात. वरील सर्व बाबींचा विचार करता कारखाना तोट्यात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे अभिजित पाटील यांनी सांगितले आहे.

............