शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

विठ्ठल कारखान्याची ६६ हजार ६४६ पोती साखर चोरून विकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST

पंढरपूर येथे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील बोलत होते. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा त्यांनी भांडाफोड ...

पंढरपूर येथे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील बोलत होते. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा त्यांनी भांडाफोड केला आहे.

पुढे पाटील म्हणाले, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला २०१८-१९, १९-२०, २०-२१ या तीन वर्षात कोणकोणत्या बँकेकडून कर्ज मंजूर झाले आहे? किती कर्ज उचलले आहे त्याचा वापर कुठे कुठे केला आहे? कोणकोणत्या संचालक व त्यांच्या नातेवाइकांकडे किती कर्ज आहे. त्या कर्जाच्या वसुलीबाबत काय कारवाई केली. चार वर्षांमध्ये तोडणी वाहतूकदारांची किती देय थकले आहे. ते देय कधी देणार, यासाठी कुठून पैसे उपलब्ध होणार? कर्मचाऱ्यांची किती महिन्याचे पगार करणे बाकी आहे, ती रक्कम किती आहे. पगार देणेबाबत काय तरतूद केली आहे?

३१ मार्च २० व ३१ मार्च २०२१ अखेरच्या हिशेबाचे ताळेबंद पत्रक व १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीच्या नफा-तोटा पत्रक यावर सविस्तरपणे माहिती देण्यात यावी. या कालावधीत तोटा झाला असल्यास कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांच्या जमिनीवर झालेल्या तोटाच या रकमेचा बोजा सोडून द्यावा, असा ठराव मंजूर करण्यात यावा.

२०१९-२० या आर्थिक वर्षात किती भंगार विक्री केले. किती दराने विक्री केली व कोणास केली आहे. या भंगार विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे, त्यामुळे सविस्तर चौकशी झाल्याशिवाय नोंद घेऊन मंजुरी देऊ नये, असा ठराव करावा.

यासह संस्थेने सन २०१९-२० व २०२०-२१ यापूर्वी बाहेरून किती निधी उभारला आहे, त्याची परतफेड केली आहे का? याची सविस्तर माहिती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत द्यावी.

त्याचबरोबर भ्रष्ट कारभार करणाऱ्या चेअरमन, व्हाइस चेअरमनसह संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतचा ठराव कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात यावा, अशी मागणी अभिजित पाटील यांनी केली आहे.

:: कारखाना तोट्यात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ::::

विठ्ठल कारखान्यास १११ कोटी नऊ लाख ४४४० रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यातून ऊसबिलाची ६२ कोटी २२ लाख ७१,३५० रुपये पूर्ण दिल्यानंतरदेखील ४८ कोटी ८६ लाख ३३,०९० रुपये शिल्लक राहत आहेत. तीन लाख ३५४७ मे. टन ६५० प्रतितोडणीप्रमाणे वाहतुकीचा खर्च १९ कोटी ७३ लाख ५५५० रुपये द्यायला पाहिजे होता. तरीदेखील अंदाजे ४८ कोटी ८६ लाख ३३०९० रुपये पैकी १९ कोटी ७३ लाख ५५५० दिले तरी २९ कोटी १३ लाख २७५४० रुपये शिल्लक राहतात. कर्मचारी पगार महिना एक कोटीप्रमाणे धरून १२ कोटी रुपये शिल्लक रक्कमेतून अदा करायला पाहिजे होता. शिल्लक रुपयांपैकी १२ कोटी रुपये पगार देऊनही १७ कोटी १३ लाख २७ हजार ५४० रुपये शिल्लक राहतात. वरील सर्व बाबींचा विचार करता कारखाना तोट्यात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे अभिजित पाटील यांनी सांगितले आहे.

............