शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

विरोध न करणारी गावे होणार लखपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:18 IST

माळशिरस तालुक्‍यात ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीबरोबर लहान लहान ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. ...

माळशिरस तालुक्‍यात ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीबरोबर लहान लहान ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुका अटी-तटीच्या झाल्याने अनेक गावांत द्वेषाची भावना पसरते. वैचारिक मतभेदाबरोबरच वादाचे मुद्दे पुढे येतात. यामुळे निवडणुका संपल्यानंतरही अनेक वर्षे ही धुसफूस वादविवादाच्या रूपाने कायम राहते.

अशा वादग्रस्त ग्रामपंचायतींना विकासकामे करणे मुश्कील होते. याच आनुषंगाने गावकऱ्यांच्या वैचारिक प्रेरणेतून ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड बिनविरोध झाल्यास गावाला शासकीय मदत मिळते. मात्र या टप्प्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना आमदार राम सातपुते यांनी प्रोत्साहनपर १५ लाख रुपयांचा विकास निधी बक्षीस म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोट ::::::::::::::::::::::

गावच्या तरुणांनी एकत्र येत गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध कराव्यात. यामुळे गावाचा एकोपा टिकून राहील. जे गाव बिनविरोध होईल, त्या गावाला प्रोत्साहनपर १५ लाख रुपये विकास निधी दिला जाईल.

- राम सातपुते

आमदार, माळशिरस