शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

उड्डाण पुलाखालील बोगद्यासाठी ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ हा वाटंबरे गावातून जात असल्याने येथे उड्डाणपुलाची निर्मिती होत आहे. मात्र, उड्डाणपुलामुळे गावाची पूर्व ...

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ हा वाटंबरे गावातून जात असल्याने येथे उड्डाणपुलाची निर्मिती होत आहे. मात्र, उड्डाणपुलामुळे गावाची पूर्व व पश्चिम बाजूला विभागणी होत असल्याने ग्रामस्थांसाठी गैरसोय झाली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूला गावठाण, तर दुसऱ्या बाजूला पवारवाडी, दऱ्याबा वस्ती, शेरे वस्ती, शिंदे मळ्यासह वाड्या-वस्त्यांचा समावेश होत आहे.

या भागातील लोकांच्या दैनंदिन गरजा भागविणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, दवाखाने, धार्मिक स्थळे ग्रामपंचायतसह तलाठी कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, स्मशानभूमी अशी सुविधा गावठाण भागात येते, तर जत-पिलीव हा जिल्हा मार्ग वाटंबरे गावातील राष्ट्रीय महामार्गास मिळत असल्याने उड्डाणपुलाखाली बोगद्याची गरज असतानादेखील तो संबंधित ठेकेदाराकडून निर्मिती केला नाही. वाटंबरेतील नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून ग्रामपंचायतीमार्फत उड्डाणपुलाखाली बोगद्याच्या निर्मितीसाठी ग्रामसभेत ठराव घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यासाठी वारंवार लेखी अर्ज देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. वाटंबरे गावातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली बोगद्याची निर्मिती न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.