शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

६२ ग्रामपंचायतींचा गावगाडा हाकणार गावकारभारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST

अक्कलकोट : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली मुसाफिरी चालवली आहे. राजकारणतरी याला कसे अपवाद ठरणार? अक्कलकोट तालुक्यात ११७ ग्रामपंचायती आहेत. ...

अक्कलकोट : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली मुसाफिरी चालवली आहे. राजकारणतरी याला कसे अपवाद ठरणार? अक्कलकोट तालुक्यात ११७ ग्रामपंचायती आहेत. नुकतीच तेथे सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये राखीव व सर्वसाधारण मिळून तब्बल ६२ ग्रामपंचायतींचा गावगाडा हाकण्याची संधी गावकारभारिणींना मिळाली आहे. यामुळे येत्या २०२५ पर्यंत तालुक्यात ‘महिलराज’ असणार आहे.

नुकत्याच ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असल्यातरी सरपंचपदाचे आरक्षण मात्र २०२५ पर्यंत काढले आहे. आरक्षण संपूर्ण ११७ ग्रामपंचायतीचे काढण्यात आले आहे. यामुळे निवडणूक झालेल्या ७२ गावातील लोकांनी प्रशासनावर नाराजी दर्शविले तर ४५ गावातील लोकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

बऱ्याच ग्रामपंचायत आरक्षण जागेसाठी ग्रामस्थांनी हरकती घेतल्या. त्याचे तात्काळ प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी निरसन केले. यंदा ७२ गावचे निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. तर उर्वरित गावचे आरक्षण निवडणूक पूर्वीच का काढण्यात आले असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला गेला. ज्या ज्या ग्रामपंचायत मध्ये काटावर बहुमत आहे. अशा ठिकाणचे सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सहलीला पाठवले आहे. सदस्य फोडाफोडीसाठी घोडेबाजार सुरू झाला आहे.

ही आहेत महिलांसाठी राखीव गावे: अनुसूचित जमाती: अंकलगे, सांगवी खु,ममनाबद, कोळीबेट, कलहिप्परगे.

अनुसूचित जाती:- साफळे, कलप्पावाडी, चिंचोळी(न.), कुमठे, संगोगी(अ), सिन्नूर अरळी.

नामप्र (ओबीसी) संगोगी (ब), उमरगे, कर्जाळ, बॅगेहळळी, मुंढेवाडी, जेऊरवाडी, शिरवळ, बोरगाव, धारसंग, हंद्राळ, नागणसुर, हैद्रा, इब्रामपूर, मराठवाडी, मिरजगी, उडगी.

सर्वसाधारण:- बादोले बु. घुंगरेगावं, सलगर, चिक्केहळळी, सांगवी बु./ कोळेकरवाडी, तळेवाढ, दोड्याळ, सुलतानपूर, शेगाव, दहिटणेवाडी, किरनळळी, चिंचोळी (मैं.), तोळणूर, खैराट, किणी, गुरववाडी, कडबगाव/सेवालालनगर, गौडगाव खु, कोर्सेगाव, नागोरे, नन्हेगाव, गोगाव, वसंतराव नाईकनगर, केगाव खु, भुरीकवटे, मंगरूळ, हंजगी, कलकर्जाळ, कुडल, चप्पळगाववाडी, सदलापूर, हसापूर, बऱ्हाणपूर, तोरणी. अशा तब्बल ६२ गावचे सरपंच आरक्षण महिलांसाठी राखीव झाले आहे. उर्वरीत ३३ ग्रामपंचायतीमध्ये कोणीही सरपंच होऊ शकतात.

----------

कोट

७२ गावांना पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण तर निवडणुका होणाऱ्या गावचे निवडणुकीपूर्वी आरक्षण कसे काय काढण्यात आले. असा सवाल माझ्यासह तालुक्यातील अनेक गावच्या ग्रामस्थांचा आहे. हा निवडणूक झालेल्या गावांवर अन्याय आहे.

-

राजकुमार लकाबशेट्टी माजी सरपंच,बबलाद.

----