शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

विजयसिंहांना आली उभारी !

By admin | Updated: May 17, 2014 01:09 IST

शरद पवारांची प्रतिष्ठा जपण्यात मिळाले यश पक्षांतर्गत नाराजी दूर केल्याचा झाला फायदा सदाभाऊ खोत यांनी दिली अटीतटीची लढत प्रतापसिंहांच्या उमेदवारीचा परिणाम नाही

 

सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी थोडक्या मतांनी का होईना मिळविलेला विजय हा त्यांच्या ‘बॅकफूट’वरून राजकारणात स्थिरावणारा ठरला आहे. यामुळे मोहिते-पाटील घराण्याला चांगले बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा या मतदारसंघातील वारसदार म्हणून विजयसिंह पुढे आले आहेत. खरंतर सुरुवातीपासूनच या मतदारसंघात राष्टÑवादीमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला होता, पण शरद पवारांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने पवारांचे या मतदारसंघातील वारसदार म्हणून राष्टÑवादीचे नेते कामाला लागले. आणि समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि सख्खे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी आव्हान दिलेले असतानाही विजयसिंहांनी थोड्या फरकाने विजय मिळवून हा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात जवळून अभ्यास, जिल्ह्यातील सहकारी संस्था उभारणीत दिलेले मोठे योगदान, शांत व संयमी स्वभाव या गोष्टी विजयसिंह यांना विजय मिळविण्यात फायद्याच्या ठरल्या आहेत. शरद पवारांच्या आदेशामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादीचे आमदार आणि नेत्यांनी विजयसिंहांचा जोमाने प्रचार केला. शिवाय शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी त्यांना दिलेले बळ, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना दिलेली चांगली साथ, प्रचारात एकसूत्रीपणा आणि सक्रियता या गोष्टी त्यांच्या विजयात सरस ठरल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी महायुतीतर्फे निवडणूक लढवून विजयसिंहांची चांगलीच दमछाक केली होती. ऊसदर आंदोलनामुळे अख्ख्या मतदारसंघात परिचय असूनही अपेक्षेप्रमाणे याचा त्यांना फायदा झाला नाही. मतदारसंघाबाहेरील उमेदवार असल्याचा मोठा फटका येथे सदाभाऊंना बसला. महायुतीत असताना या मतदारसंघातील मित्रपक्षांनी प्रचारात म्हणावी तशी सक्रियता दाखविली नसल्याचा फटका त्यांना बसला. या मतदारसंघातील शेतकर्‍यांचा पाणीप्रश्न सदाभाऊंना आक्रमकपणे मांडता आला नाही.

-------------------

या कारणांमुळे मिळाला विजय विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विजयासाठी राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व राष्टÑवादीच्या नेत्यांनी जातीने लक्ष घातले होते. शरद पवारांचे या मतदारसंघात वारसदार म्हणून विजयसिंहांकडे पाहिले गेले. सातारा जिल्ह्यातील माण, फलटण, खटावमधील काँग्रेस नेत्यांनी सुरुवातीला नाराजी दर्शविली खरी, पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: लक्ष घालून काँग्रेस नेत्यांमधील नाराजी दूर करण्यात यश मिळविले. सुरुवातीला नेत्यांमध्ये उमटलेली नाराजी दूर करण्यात यश मिळविता आले. यासाठी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जातीने या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचाराच्या प्रवाहात आणले.

-------------

जिंकल्याचे कारण राष्टÑवादीच्या नेत्यांची प्रचारात सक्रियता मतदारसंघात पवारांनी जातीने घातलेले लक्ष काँग्रेस, शेकापची मिळालेली चांगली साथ प्रचारात सक्रियता

---------------------

हरल्याचे कारण मतदारसंघाबाहेरील उमेदवार केवळ शेतकर्‍यांचेच कैवारी असल्याचा ठपका महायुतीतील मित्रपक्षांची म्हणावी तशी साथ नव्हती