शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

ऑक्सिजनअभावी रुग्णांचे गेलेले बळी हे सरकारी अनास्थेमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:20 IST

पंढरपूर येथे पत्रकार परिषदेदरम्यान भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये बोलत होते. यावेळी शंतनु दंडवते, काशिनाथ थिटे उपस्थित होते. ...

पंढरपूर येथे पत्रकार परिषदेदरम्यान भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये बोलत होते. यावेळी शंतनु दंडवते, काशिनाथ थिटे उपस्थित होते. पुढे उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी केवळ स्वप्रतिमा उंचावणे आणि प्रसिद्धी यावरच भर दिला. अर्थसंकल्पातसुद्धा प्रतिमा उंचावण्यासाठी २०० कोटींची तरतूद, आमदारांच्या निधीत वाढ, तर मंत्र्यांच्या बंगल्यावर आणि गाड्यांवर वारेमाप खर्च केला; पण कोरोनाच्या महासंकटात आरोग्य सेवेसाठी मात्र सरकारकडे निधी नाही. त्यामुळे या सरकारची नक्की प्राथमिकता तरी काय, हा प्रश्न जनतेला आज पडत आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक आणीबाणीमध्ये थोडेतरी संवेदनशील व्हा, जनतेचे प्रश्न सोडवण्याचे धोरण अवलंबा आणि निरपराध जनतेचे जीव आणि अनेक कुटुंब उद‌्ध्वस्त होण्यापासून वाचवा.

घरात बसून केंद्रावर बिनबुडाचे आरोप

सोमवारी दिवसभरात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याआधी ठाण्यातील एका रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ३० रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले. मार्च महिन्यात नागपूरमध्ये एका रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा संपल्यामुळे चक्क गंभीर असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला. या घटना माध्यमातून उघडकीस आल्या म्हणून आपल्यापर्यंत पोहोचल्या. पण राज्यभरात अशा अजून कितीतरी घटना नक्कीच घडल्या असतील. ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसतील. मात्र गेंड्याची कातडी असलेल्या या सरकारला त्याचे काहीही सोयरसूतक नाही. उलटपक्षी आपापल्या घरात बसून केंद्रावर बिनबुडाचे फसवे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्यातच या सरकारला धन्यता वाटते. आज राज्याला असे असंवेदनशील सरकार लाभले आहे, हे खरंच जनतेचे दुर्दैव असल्याचे केशव उपाध्ये म्हणाले.