शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

ऑक्सिजनअभावी रुग्णांचे गेलेले बळी हे सरकारी अनास्थेमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:20 IST

पंढरपूर येथे पत्रकार परिषदेदरम्यान भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये बोलत होते. यावेळी शंतनु दंडवते, काशिनाथ थिटे उपस्थित होते. ...

पंढरपूर येथे पत्रकार परिषदेदरम्यान भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये बोलत होते. यावेळी शंतनु दंडवते, काशिनाथ थिटे उपस्थित होते. पुढे उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी केवळ स्वप्रतिमा उंचावणे आणि प्रसिद्धी यावरच भर दिला. अर्थसंकल्पातसुद्धा प्रतिमा उंचावण्यासाठी २०० कोटींची तरतूद, आमदारांच्या निधीत वाढ, तर मंत्र्यांच्या बंगल्यावर आणि गाड्यांवर वारेमाप खर्च केला; पण कोरोनाच्या महासंकटात आरोग्य सेवेसाठी मात्र सरकारकडे निधी नाही. त्यामुळे या सरकारची नक्की प्राथमिकता तरी काय, हा प्रश्न जनतेला आज पडत आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक आणीबाणीमध्ये थोडेतरी संवेदनशील व्हा, जनतेचे प्रश्न सोडवण्याचे धोरण अवलंबा आणि निरपराध जनतेचे जीव आणि अनेक कुटुंब उद‌्ध्वस्त होण्यापासून वाचवा.

घरात बसून केंद्रावर बिनबुडाचे आरोप

सोमवारी दिवसभरात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याआधी ठाण्यातील एका रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ३० रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले. मार्च महिन्यात नागपूरमध्ये एका रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा संपल्यामुळे चक्क गंभीर असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला. या घटना माध्यमातून उघडकीस आल्या म्हणून आपल्यापर्यंत पोहोचल्या. पण राज्यभरात अशा अजून कितीतरी घटना नक्कीच घडल्या असतील. ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसतील. मात्र गेंड्याची कातडी असलेल्या या सरकारला त्याचे काहीही सोयरसूतक नाही. उलटपक्षी आपापल्या घरात बसून केंद्रावर बिनबुडाचे फसवे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्यातच या सरकारला धन्यता वाटते. आज राज्याला असे असंवेदनशील सरकार लाभले आहे, हे खरंच जनतेचे दुर्दैव असल्याचे केशव उपाध्ये म्हणाले.