शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

वीर धरण भरले ; नीरा नदीत पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

वीर धरणामध्ये भाटघर, नीरा-देवधर व गुंजवणी या तीन धरणांमधून पाणी येते. त्यामुळे वीर धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. वीर ...

वीर धरणामध्ये भाटघर, नीरा-देवधर व गुंजवणी या तीन धरणांमधून पाणी येते. त्यामुळे वीर धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. वीर धरण जवळजवळ पूर्ण म्हणजे ९८.१९ टक्के भरले आहे. चारही धरणे सरासरी ७७ टक्के भरली असून ३७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी सरासरी चार धरणे ३६ टक्के भरली होती. वीर धरण गतवर्षीपेक्षा चालू वर्षी ६० टक्केपेक्षा जास्त क्षमतेने भरले आहे. वीर धरणामध्ये आजअखेर एकूण पाणीसाठा ५७९.८५ द.ल.घ.मी., उपयुक्त पाणीसाठा ५७१.६२ द.ल.घ.मी. असून पाणीपातळी ५७९.६९ मीटर आहे.

तीन तालुक्याच्या शेतीला संजीवनी

धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे गुंजवणी, नीरा-देवधर आणि भाटघर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वीर धरण परिसरात यंदा जेमतेम पाऊस झाला. मात्र धरणात सोडलेल्या पाण्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. वीर धरणात गतवर्षीपेक्षा लवकर पाणी जमा झाल्याने नीरा नदीतून पाणी वाहत आहे. त्यामुळे माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतीला संजीवनी मिळणार आहे.

वीर, भाटघर, नीरा-देवधर, गुंजवणी धरणाची स्थिती

वीर धरण

पावसाची नोंद : २४१ मिमी.

टक्केवारी : ९.१७ टीएमसी पाणी ९८.१९ टक्के.

गतवर्षी टक्केवारी : ३.६६ टीएमसी पाणी ३८.८८ टक्के.

भाटघर धरण :

पावसाची नोंद : ४५३ मिमी.

टक्केवारी : १४.४१ टीएमसी पाणी ६१.३० टक्के.

गतवर्षी टक्केवारी : ९.०७ टीएमसी पाणी ३८.५६ टक्के.

निरा देवधर :

पावसाची नोंद : १५५७ मिमी.

टक्केवारी : १०.३४ टीएमसी पाणी ८८.१९ टक्के.

गतवर्षी टक्केवारी : २.८३ टीएमसी पाणी २४.१२ टक्के.

गुंजवणी धरण :

पावसाची नोंद : ११८२ मिमी.

टक्केवारी : ३.१९ टीएमसी पाणी ८६.६६ टक्के.

गतवर्षी टक्केवारी : १.८१ टीएमसी पाणी ५१.७२ टक्के.