शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वीर धरण भरले ; नीरा नदीत पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

वीर धरणामध्ये भाटघर, नीरा-देवधर व गुंजवणी या तीन धरणांमधून पाणी येते. त्यामुळे वीर धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. वीर ...

वीर धरणामध्ये भाटघर, नीरा-देवधर व गुंजवणी या तीन धरणांमधून पाणी येते. त्यामुळे वीर धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. वीर धरण जवळजवळ पूर्ण म्हणजे ९८.१९ टक्के भरले आहे. चारही धरणे सरासरी ७७ टक्के भरली असून ३७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी सरासरी चार धरणे ३६ टक्के भरली होती. वीर धरण गतवर्षीपेक्षा चालू वर्षी ६० टक्केपेक्षा जास्त क्षमतेने भरले आहे. वीर धरणामध्ये आजअखेर एकूण पाणीसाठा ५७९.८५ द.ल.घ.मी., उपयुक्त पाणीसाठा ५७१.६२ द.ल.घ.मी. असून पाणीपातळी ५७९.६९ मीटर आहे.

तीन तालुक्याच्या शेतीला संजीवनी

धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे गुंजवणी, नीरा-देवधर आणि भाटघर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वीर धरण परिसरात यंदा जेमतेम पाऊस झाला. मात्र धरणात सोडलेल्या पाण्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. वीर धरणात गतवर्षीपेक्षा लवकर पाणी जमा झाल्याने नीरा नदीतून पाणी वाहत आहे. त्यामुळे माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतीला संजीवनी मिळणार आहे.

वीर, भाटघर, नीरा-देवधर, गुंजवणी धरणाची स्थिती

वीर धरण

पावसाची नोंद : २४१ मिमी.

टक्केवारी : ९.१७ टीएमसी पाणी ९८.१९ टक्के.

गतवर्षी टक्केवारी : ३.६६ टीएमसी पाणी ३८.८८ टक्के.

भाटघर धरण :

पावसाची नोंद : ४५३ मिमी.

टक्केवारी : १४.४१ टीएमसी पाणी ६१.३० टक्के.

गतवर्षी टक्केवारी : ९.०७ टीएमसी पाणी ३८.५६ टक्के.

निरा देवधर :

पावसाची नोंद : १५५७ मिमी.

टक्केवारी : १०.३४ टीएमसी पाणी ८८.१९ टक्के.

गतवर्षी टक्केवारी : २.८३ टीएमसी पाणी २४.१२ टक्के.

गुंजवणी धरण :

पावसाची नोंद : ११८२ मिमी.

टक्केवारी : ३.१९ टीएमसी पाणी ८६.६६ टक्के.

गतवर्षी टक्केवारी : १.८१ टीएमसी पाणी ५१.७२ टक्के.