शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

By admin | Updated: June 24, 2014 01:26 IST

२४ जुलैपासून प्रारंभ : १५ देशातील ४० चित्रपटांचा समावेश

सोलापूर : किर्लोस्कर उद्योग समूह व सृजन फिल्म सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २७ जुलैदरम्यान येथे ‘वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन केले असल्याची माहिती ‘किर्लोस्कर’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक डॉ. एस. पी. वैद्य यांनी आज पत्रपरिषदेत दिली. किर्लोस्कर समूहाच्या वतीने सहा राज्यातील २८ शहरांमध्ये हा महोत्सव होणार असून, या उपक्रमाचा प्रारंभ सोलापूरपासून होईल, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.डॉ. फडकुले सभागृहात हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, दि. २४ जुलै रोजी फोटो फिल्म कार्यशाळेने उद्घाटन होणार आहे. ‘फाइव्ह आर स्मॉल एफर्ट, बिग डिफरन्स’ हे या महोत्सवाचे बोधवाक्य आहे. ‘फाइव्ह आर’मध्ये रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिकव्हर यांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून येथे हा महोत्सव आयोजित होत आहे. सोलापूर विद्यापीठ, लोकमंगल प्रतिष्ठान, शासनाचा वनीकरण विभाग, हरितक्रांती सेना, रोटरी क्लब, इन्टॅक्ट आणि शाळा व महाविद्यालयांचे महोत्सवाला सहकार्य लाभणार आहे. महोत्सवातील प्रवेश विनामूल्य आहे, अशी माहिती डॉ. वैद्य यांनी दिली.यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, आॅस्ट्रेलिया, इजिप्त, मेक्सिको, इंग्लंड, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, केनिया, जपान, टांझानिया, मंगोलिया या देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय ‘पर्यावरण माझ्या नजरेतून आणि माझं सोलापूर (चांगलं/ वाईट) या विषयावर छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ३०० रिझुलोशनमध्ये ८ बाय १० इंच या साईजमध्ये छायाचित्रे पाठवावीत, असे आवाहन त्यांनी केले. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, हसत खेळत पर्यावरण, पथनाट्य स्पर्धा, नेचर व हेरिटेज वॉक आदी उपक्रमही होणार आहेत. यावेळी वीरेंद्र चित्राव, सृजनचे अमोल चाफळकर, सोलापूर विद्यापीठाच्या वृत्तविद्या विभागाचे डॉ. रवींद्र चिंचोलकर, बाबुराव पेठकर, किर्लोस्कर समूहाचे ऋषीकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. -----------------------महोत्सवाचे स्वरूप२४ जुलै - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स, पॉवर पॉइंट प्रेझेंन्टेशन२५ जुलै - पर्यावरण दिंडी, वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण२६ जुलै - चित्रपट प्रदर्शन, अन्य स्पर्धा२७ जुलै - ‘फाइव्ह आर’वर प्रियदर्शिनी कर्वे यांची कार्यशाळा, समारोप---------------------------कॅरिबॅगमुक्त सोलापूरवसुंधरा चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ‘कॅरिबॅगमुक्त सोलापूर’ ही मोहीम राबविण्यात येणार असून, मायक्रॉन प्लास्टिकमुळे जलवाहिन्या तुंबणे, प्राण्यांचे मृत्यू अशा घटना घडत आहेत. त्यामुळे आम्ही ही चळवळ राबवित आहोत, असे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले.इको रेंजर्स-इको रेंजर्स हा उपक्रम यंदाच्या वर्षापासून पुणे येथे राबविण्यात येईल. शहरातील महाविद्यालयांमधील दहा विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून पर्यावरण