शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

‘वंदे भारत’ धावणार ११० च्या स्पीडने, सोळा डबे अन् सात स्थानकांचे थांबे

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 31, 2023 12:20 IST

मुंबई- सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस गाडी दहा फेब्रुवारीपासून धावणार असून ही गाडी एकशे दहा किलोमीटर गतीने धावणार आहे.

सोलापूर :

मुंबई- सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस गाडी दहा फेब्रुवारीपासून धावणार असून ही गाडी एकशे दहा किलोमीटर गतीने धावणार आहे. सोलापूर ते मुंबई रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळाची क्षमता एकशे वीस किमी स्पीडची असून या मार्गावर वंदे भारत एकशे दहा किमी स्पीडने धावणार आहे. रुळाची क्षमता वाढवण्यापूर्वीच वंदे भारत गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रुळाच्या दुरुस्तीसह इतर कामे मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर सुरू आहेत. साेळा डब्यांच्या या वातानुकूलित गाडीला एकूण सात ठिकाणी थांबे दिले आहेत.

पहिल्या आठवड्यात ही गाडी ट्रायल बेसवर धावणार आहे. यात गाडीचा वेग, नियोजित वेळापत्रक, प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळेल याची चाचपणी होईल. त्यानंतर गाडीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. मुंबईहून सोलापूरकडे यायला या गाडीला साडे सहा तास लागणार असून यात वेळेची कपात करण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. वंदे भारतची गती प्रतिसाद १८० किमी आहे; परंतु मुंबई ते सोलापूर मार्गावरील रुळाची क्षमता केवल एकशे वीस किमी आहे. त्यामुळे ही गाडी एकशे दहा ते एकशे वीस किमीने धावणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता सीएसटी रेल्वे स्थानकावर वंदे भारतचे उद्घाटन होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रम सोलापूरहून ऑनलाइन होण्याची शक्यता आहे. सोलापूर रेल्वे प्लॅटफॉर्मवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. ११ फेब्रुवारीपासून सोलापुरातून रोज सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी वंदे भारत गाडी मुंबईकडे धावणार आहे. मुंबई, दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डूवाडी तसेच सोलापूर या सात ठिकाणी गाडी थांबणार आहे.