शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

‘वंदे भारत’ धावणार ११० च्या स्पीडने, सोळा डबे अन् सात स्थानकांचे थांबे

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 31, 2023 12:20 IST

मुंबई- सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस गाडी दहा फेब्रुवारीपासून धावणार असून ही गाडी एकशे दहा किलोमीटर गतीने धावणार आहे.

सोलापूर :

मुंबई- सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस गाडी दहा फेब्रुवारीपासून धावणार असून ही गाडी एकशे दहा किलोमीटर गतीने धावणार आहे. सोलापूर ते मुंबई रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळाची क्षमता एकशे वीस किमी स्पीडची असून या मार्गावर वंदे भारत एकशे दहा किमी स्पीडने धावणार आहे. रुळाची क्षमता वाढवण्यापूर्वीच वंदे भारत गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रुळाच्या दुरुस्तीसह इतर कामे मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर सुरू आहेत. साेळा डब्यांच्या या वातानुकूलित गाडीला एकूण सात ठिकाणी थांबे दिले आहेत.

पहिल्या आठवड्यात ही गाडी ट्रायल बेसवर धावणार आहे. यात गाडीचा वेग, नियोजित वेळापत्रक, प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळेल याची चाचपणी होईल. त्यानंतर गाडीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. मुंबईहून सोलापूरकडे यायला या गाडीला साडे सहा तास लागणार असून यात वेळेची कपात करण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. वंदे भारतची गती प्रतिसाद १८० किमी आहे; परंतु मुंबई ते सोलापूर मार्गावरील रुळाची क्षमता केवल एकशे वीस किमी आहे. त्यामुळे ही गाडी एकशे दहा ते एकशे वीस किमीने धावणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता सीएसटी रेल्वे स्थानकावर वंदे भारतचे उद्घाटन होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रम सोलापूरहून ऑनलाइन होण्याची शक्यता आहे. सोलापूर रेल्वे प्लॅटफॉर्मवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. ११ फेब्रुवारीपासून सोलापुरातून रोज सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी वंदे भारत गाडी मुंबईकडे धावणार आहे. मुंबई, दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डूवाडी तसेच सोलापूर या सात ठिकाणी गाडी थांबणार आहे.