शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खेळांच्या मेजवानीने वैष्णवजन तृप्प

By admin | Updated: July 6, 2014 00:23 IST

माऊलींचा रिंगण सोहळा : भाविकांनी केला हरिनामाचा जयजयकार

खेळांच्या मेजवानीने वैष्णवजन तृप्पमाऊलींचा रिंगण सोहळा : भाविकांनी केला हरिनामाचा जयजयकारबाळासाहेब बोचरे ल्ल वेळापूरनाचत जाऊ त्याच्या गावा रे। खेळीया सुख देईल विसावा।।सकाळचे खुडूसचे रिंगण, दुपारचा धावा आणि धाव्यानंतर रंगलेली भारूडे अशी दिवसभर एकामागोमाग एक खेळाची मेजवानी असल्याने वारकऱ्यांचा शीण गेला.खुडूस येथे सकाळचे रिंगण असल्याने खुडूसकरांनी रिंगणाची जागा स्वच्छ केली होती. विस्तीर्ण पटांगणात बहुतांश दिंड्या रिंगणात आल्या होत्या. टाळ, मृदंगाचा अखंड गजर चालू होता. कोवळ्या उन्हात देवाचा खेळ पाहण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातील भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. पटांगण मोठे असल्याने धावपट्टीही मोठी तयार करण्यात आली होती.सकाळी नऊ वाजता माऊलींची पालखी रिंगणस्थळी आली. पालखी मध्यभागी स्थानापन्न झाल्यावर पालखीला झेंडेकऱ्यांनी कडे केले. रिंगणाच्या धावपट्टीवर अश्व सज्ज ठेवण्यात आले. शिस्तीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ख्यातकीर्त असलेल्या या सोहळ्यातील चोपदारांनी काही मिनिटांत रिंगण लावून घेतले. बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार रिंगण लावत होते. रामभाऊ चोपदार व उद्धव चोपदार दिंड्या सोडत होते. रिंगणाची तयारी अवघ्या दहा मिनिटांत करण्यात आली. भाविकांचे सहकार्य आणि पोलिसांची मदतही याकामी उपयोगी पडली. पंधराव्या मिनिटाला भोपळे दिंडीच्या जरीपटकाधारीने फेऱ्या मारून औपचारिक सुरूवात केली. शिंगतुतारी आणि टाळ, मृदंगाच्या निनादात अश्वांना दौडीसाठी सोडून देण्यात आले.देहभान हरपलेला वैष्णवांचा मेळा या खेळाकडे डोळे भरून पहात होता आणि तो डोळ्यात साठवत होता. पुढे स्वाराचा अश्व , मागे माऊलींचा अश्व असा हा पाठशिवणीचा खेळ खेळत माऊलींनी स्वाराला कधी मागे टाकले आणि पाहता पाहता चार फेऱ्या पूर्ण केल्या हे कळले देखील नाही. सकाळच्या प्रहरी झालेल्या या खेळाचा वारकऱ्यांनी मनमुराद आनंद लुटला. उडीच्या खेळानंतर सोहळा पुढच्या वाटचालीस मार्गस्थ झाला.---------------------------गेली १३ वर्षे मी पायी वारी करते. चार फेऱ्या मारल्यानंतर माऊलींचा अश्व माझ्याजवळ येऊन थांबला हे पाहून मी फारच भावनावश झाले आणि तिथेच नतमस्तकही झाले. माझ्या दृष्टीने हा अद्भुत योगायोग असला तरी त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला.- प्रतिभाताई पाचपुते----------------------------इंद्रायणीचे पाणी निघाले पंढरपुरीज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात डोक्यावर महादेवाची पिंड घेऊन वारी करणारे उत्तम सर्जेराव चंद्रटिके. औरंगाबाद जिल्ह्यातील गल्लेबोरगावाचे आहेत. इंद्रायणी नदीचे पाणी घेऊन पांडुरंगाच्या चरणी धार घालण्यासाठी वारी करीत आहेत.