शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

संतनाथ महाराज की जय म्हणत वैरागकरांचा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:21 IST

वैराग ग्रामपंचायतची नगरपंचायत म्हणून उद्घोषणा झाली आहे. तसेच नगरविकास विभागाने निवडणूक कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली ...

वैराग ग्रामपंचायतची नगरपंचायत म्हणून उद्घोषणा झाली आहे. तसेच नगरविकास विभागाने निवडणूक कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली आहे. मात्र या विनंतीला आयोगाने गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम चालूच आहे. या पार्श्वभूमीवर रविवार ग्रामदैवत संतनाथ महाराजांच्या मंदिरात सर्व राजकीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी बैठक बोलावली होती.

यावेळी राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर, भाजपचे संतोष निंबाळकर व अरुण सावंत या मुख्य पॅनल प्रमुखांसह सर्व इच्छुक व उपस्थित नागरिकांनी ग्रामदैवत संतनाथ महाराजांची शपथ घेऊन प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन कोणीही अर्ज दाखल करावयाचा नाही, असे ठरले. तसेच नगरपंचायतीच्या प्रक्रियेला सर्वांनी पाठिंबा जाहीर केला. एकदा निवडणूक झाली तर किमान अडीच वर्षाचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. नगरपंचायत झाली तर सर्वाचाच वेळ, पैसा, श्रम वाया जाणार आहे. तसेच निवडणूक विभागावरपण आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे शहराच्या हितासाठी कोणीही निवडणूक रिंगणात उतरू नये, असे सर्वानुमते ठरले.

यावेळी माजी शिक्षण सभापती मकरंद निंबाळकर, राजकुमार पौळ, अहमद चौधरी, मारुती जिरंगे, किशोर देशमुख, चंद्रकांत तावसकर, समीर शेख आदींसह नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो

२७ वैराग०१

वैराग येथील श्री संतनाथ मंदिरात सध्याच्या ग्रामपंचायत प्रक्रियेस विरोध करण्यासाठी आयोजित बैठकीत चर्चा करताना पॅनलप्रमुख व ग्रामस्थ.

२७वैराग०२

वैराग ग्रामपंचायत निवडणुकीस विरोध करण्यासाठी एकत्र आलेले सर्व पॅनलप्रमुख.