शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

वादळी वाऱ्यात पडलेले पोल केले पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

६ मे रोजी सायं. ७ च्या सुमारास वादळी वाऱ्यात महावितरण कंपनीच्या कटफळ उपकेंद्राला जोडणाऱ्या ३३ के.व्ही. वाहिनीचे तब्बल १० ...

६ मे रोजी सायं. ७ च्या सुमारास वादळी वाऱ्यात महावितरण कंपनीच्या कटफळ उपकेंद्राला जोडणाऱ्या ३३ के.व्ही. वाहिनीचे तब्बल १० लोखंडी खांब (पोल) वाकून पिरगळले तर काही ठिकाणीचे कोसळले होते. त्यामुळे कटफळ उपकेंद्रासह इटकी, खवासपूर अंतर्गत गावांसह वाड्या-वस्त्यावरील वीजपुरवठा खंडित झाला होता. शुक्रवारी सकाळी ९ वाजता नवीन पोल उभारणीसाठी कामाला सुरुवात झाली. महावितरणचे २५ कर्मचारी व ठेकेदार कामगार १५ अशा ४० जणांनी वाकलेले पोल काढून नवीन पोल उभे करून तारा ओढण्यास सुरुवात केली.

यावेळी अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता संजय गवळी, उपकार्यकारी अभियंता आनंदा पवार हे कामाच्या ठिकाणी तळ ठोकून मार्गदर्शन करत होते. ज्या भागात पोल वाकले होते तो भाग माळरान असून जमीन मुरमाड असल्याने यंत्राच्या मदतीने खड्डे खोदून तारा ओढण्याचे आव्हान असताना सदरचे काम दिवस-रात्र शनिवारी पहाटे ४:३० पर्यंत तब्बल १९ तास चालले. त्यानंतर सर्वांना कटफळ उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले.

अन‌् सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

वादळी वाऱ्यात पडलेले १० लोखंडी खांब उभे करणे व वाहिन्या जोडण्याचे आव्हान होते. लाॅकडाऊनमुळे चहापाणी व जेवणाची सोय होऊ शकली नाही. अशाप्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तळ ठोकून फास्ट फूड घेऊन मार्गदर्शन केले. जनमित्रांच्या अथक परिश्रमानंतर खंडित वीजपुरवठा पूर्ववत होताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचा अविस्मरणीय प्रसंग उपकार्यकारी अभियंता आनंदा पवार यांनी सांगितला.

फोटो ओळ ::::::::::::::::::::

वादळी वाऱ्यात पडलेले विजेचे लोखंडी खांब उभे करताना महावितरण कंपनीचे कर्मचारी व ठेकेदारांचे कामगार.