शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

वादळी वाऱ्यात पडलेले पोल केले पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

६ मे रोजी सायं. ७ च्या सुमारास वादळी वाऱ्यात महावितरण कंपनीच्या कटफळ उपकेंद्राला जोडणाऱ्या ३३ के.व्ही. वाहिनीचे तब्बल १० ...

६ मे रोजी सायं. ७ च्या सुमारास वादळी वाऱ्यात महावितरण कंपनीच्या कटफळ उपकेंद्राला जोडणाऱ्या ३३ के.व्ही. वाहिनीचे तब्बल १० लोखंडी खांब (पोल) वाकून पिरगळले तर काही ठिकाणीचे कोसळले होते. त्यामुळे कटफळ उपकेंद्रासह इटकी, खवासपूर अंतर्गत गावांसह वाड्या-वस्त्यावरील वीजपुरवठा खंडित झाला होता. शुक्रवारी सकाळी ९ वाजता नवीन पोल उभारणीसाठी कामाला सुरुवात झाली. महावितरणचे २५ कर्मचारी व ठेकेदार कामगार १५ अशा ४० जणांनी वाकलेले पोल काढून नवीन पोल उभे करून तारा ओढण्यास सुरुवात केली.

यावेळी अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता संजय गवळी, उपकार्यकारी अभियंता आनंदा पवार हे कामाच्या ठिकाणी तळ ठोकून मार्गदर्शन करत होते. ज्या भागात पोल वाकले होते तो भाग माळरान असून जमीन मुरमाड असल्याने यंत्राच्या मदतीने खड्डे खोदून तारा ओढण्याचे आव्हान असताना सदरचे काम दिवस-रात्र शनिवारी पहाटे ४:३० पर्यंत तब्बल १९ तास चालले. त्यानंतर सर्वांना कटफळ उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले.

अन‌् सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

वादळी वाऱ्यात पडलेले १० लोखंडी खांब उभे करणे व वाहिन्या जोडण्याचे आव्हान होते. लाॅकडाऊनमुळे चहापाणी व जेवणाची सोय होऊ शकली नाही. अशाप्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तळ ठोकून फास्ट फूड घेऊन मार्गदर्शन केले. जनमित्रांच्या अथक परिश्रमानंतर खंडित वीजपुरवठा पूर्ववत होताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचा अविस्मरणीय प्रसंग उपकार्यकारी अभियंता आनंदा पवार यांनी सांगितला.

फोटो ओळ ::::::::::::::::::::

वादळी वाऱ्यात पडलेले विजेचे लोखंडी खांब उभे करताना महावितरण कंपनीचे कर्मचारी व ठेकेदारांचे कामगार.