शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

उजनीचा पाणीसाठा ५० दिवसांत ४० टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:41 IST

गतवर्षी १२ मार्च २०२० ला एकूण पाणी साठा ६३ टक्के होता तर यंदा तो ६४.८२ टक्क्यावर आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची ...

गतवर्षी १२ मार्च २०२० ला एकूण पाणी साठा ६३ टक्के होता तर यंदा तो ६४.८२ टक्क्यावर आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची स्थिती गतवर्षी ३३.७६ टीएमसी तर यंदा ३४.७३ टीएमसी आहे.

चालू वर्षी उजनी धरणात १११ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर घट होऊन पाणीसाठा १०४ टक्के राहिला होता. उजनी धरणातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाणी सुटणार असल्याने कालवा काठावरील लोकांची निराशा झाली आहे. तापमानाची तीव्रता वाढल्याने शेतातील पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. शेतकरी पाण्याची वाट पाहात आहेत.

चालू वर्षी उजनीत १११ टक्के पाणीसाठा जमा होऊनही उजनी धरण लाभक्षेत्रात पाहिजे, त्या प्रमाणात ठिबक सिंचनचा वापर होताना दिसत नाही. ठिबक सिंचन सबसिडी मिळत नाही व ऊस या पिकाला जास्त पाणी लागत असल्याने त्यामुळे बेसुमार पाणी उपसा व त्यातच आता बाष्पीभवनात वाढ झाल्याने उजनीच्या टक्केवारीत कमालीची घट होताना दिसून येत आहे.

----

चालू वर्षी उन्हाळ्यात पाण्याची दोन रोटेशन सोडायचे की, एका पाळीवर थांबायचे अजून ठरलेले नाही. साधारणपणे दोन एप्रिलपासून पाणी सोडण्याचे संकेत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिले.

उजनीची सद्यस्थिती

एकूण पाणी पातळी ४९५.१२० मीटर

एकूण पाणीसाठा २७८६.२५ दलघमी

(९८.३८ टीएमसी)

उपयुक्त पाणीसाठा

९८३.४४ दलघमी

(३४.७३ टीएमसी)

टक्केवारी ६४.८२

फोटो

१२उजनी०१