शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

उजनीचे पाणी इंदापूरला, लोकप्रतिनिधींसह शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:19 IST

दुसरीकडे शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर आता त्यास विरोध दर्शवणारे लोकप्रतिनिधी निर्णय प्रक्रिया चालू असताना काय झोपले होते का? असा ...

दुसरीकडे शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर आता त्यास विरोध दर्शवणारे लोकप्रतिनिधी निर्णय प्रक्रिया चालू असताना काय झोपले होते का? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. काही लोकप्रतिनिधी आपल्या शिरस्त नेत्याला कसा विरोध करायचा म्हणून तर काही प्रश्नाचे गांभीर्य लक्षात न आल्याने निर्णय प्रक्रिया चालू असताना बघ्याची भूमिका घेतल्याची भावना व्यक्त केली. उजनीच्या पाण्यावर अनेकांचा डोळा असल्याने पाणी वाटपामध्ये अनेक वेळा बदल केला. यातूनच पूर्वी बारमाही असलेले उजनी धरण आता आठ महिने झाले आहे.

उजनीच्या पाण्याची अनेक वेळा पळवापळवी झाली. अनेक करार करून पाणी उद्योगासाठी परस्पर पळवले गेले. हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले नाही. उदा. सीनारमास व अलीकडच्या काळातील एनटीपीसीला दिलेले दोन टीएमसी पाणी.

ज्या शेतकऱ्यांनी उजनी धरणासाठी त्याग केला. त्यांना तहानलेले ठेवून दुसऱ्याची तहान भागवण्याचे राजकारण काय आहे हे जनतेला समजत नाही. राजकारणी आपल्या सोयीसाठी जनता व शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत.

पाण्याचे वाटप करण्यात अडचणी

धरणातील पाण्याचे वाटप अगोदरच झालेले आहे. तेही देण्यात सध्या अडचणी येत आहेत. तसेच पूर्वीच्या सिंचन योजना अद्याप अपूर्ण असताना नवीन योजनेसाठी पाणी कोठून देणार हा प्रश्न अनाकलनीय आहे. २५ वर्षांपूर्वी चालू झालेली सीना-माढा उपसा सिंचन योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. बार्शी व शिरापूर उपसा सिंचन योजना आजही अपूर्ण आहेत. ४० वर्षांनंतरही जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट व सांगोला या तालुक्यांना अद्याप पाणी मिळालेले नाही. यासाठी हाती घेतलेल्या योजना अद्यापी अपूर्ण आहेत. मूळ नियोजनात नसलेले २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला द्यावयाचे आहे. या सर्व योजनांसाठी उजनीतील उपलब्ध पाणी कमी पडत असताना जादाचे पाणी कोठून आणणार हा यक्ष प्रश्न आहे.

पाणी वाटपातील बदलांमुळे हक्काचे पाणी मिळेना

उजनी धरण निर्मितीसाठी जिल्ह्यातील विशेष करून करमाळा व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या. त्यावेळी या शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्याचे अभिवचन शासनाकडून देण्यात आले होते, आता मात्र वारंवार होणाऱ्या पाणी वाटपातील बदलामुळे व पाणी पळवापळवीमुळे येथील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे.