शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचे पाणी इंदापूरला, लोकप्रतिनिधींसह शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:19 IST

दुसरीकडे शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर आता त्यास विरोध दर्शवणारे लोकप्रतिनिधी निर्णय प्रक्रिया चालू असताना काय झोपले होते का? असा ...

दुसरीकडे शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर आता त्यास विरोध दर्शवणारे लोकप्रतिनिधी निर्णय प्रक्रिया चालू असताना काय झोपले होते का? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. काही लोकप्रतिनिधी आपल्या शिरस्त नेत्याला कसा विरोध करायचा म्हणून तर काही प्रश्नाचे गांभीर्य लक्षात न आल्याने निर्णय प्रक्रिया चालू असताना बघ्याची भूमिका घेतल्याची भावना व्यक्त केली. उजनीच्या पाण्यावर अनेकांचा डोळा असल्याने पाणी वाटपामध्ये अनेक वेळा बदल केला. यातूनच पूर्वी बारमाही असलेले उजनी धरण आता आठ महिने झाले आहे.

उजनीच्या पाण्याची अनेक वेळा पळवापळवी झाली. अनेक करार करून पाणी उद्योगासाठी परस्पर पळवले गेले. हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले नाही. उदा. सीनारमास व अलीकडच्या काळातील एनटीपीसीला दिलेले दोन टीएमसी पाणी.

ज्या शेतकऱ्यांनी उजनी धरणासाठी त्याग केला. त्यांना तहानलेले ठेवून दुसऱ्याची तहान भागवण्याचे राजकारण काय आहे हे जनतेला समजत नाही. राजकारणी आपल्या सोयीसाठी जनता व शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत.

पाण्याचे वाटप करण्यात अडचणी

धरणातील पाण्याचे वाटप अगोदरच झालेले आहे. तेही देण्यात सध्या अडचणी येत आहेत. तसेच पूर्वीच्या सिंचन योजना अद्याप अपूर्ण असताना नवीन योजनेसाठी पाणी कोठून देणार हा प्रश्न अनाकलनीय आहे. २५ वर्षांपूर्वी चालू झालेली सीना-माढा उपसा सिंचन योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. बार्शी व शिरापूर उपसा सिंचन योजना आजही अपूर्ण आहेत. ४० वर्षांनंतरही जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट व सांगोला या तालुक्यांना अद्याप पाणी मिळालेले नाही. यासाठी हाती घेतलेल्या योजना अद्यापी अपूर्ण आहेत. मूळ नियोजनात नसलेले २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला द्यावयाचे आहे. या सर्व योजनांसाठी उजनीतील उपलब्ध पाणी कमी पडत असताना जादाचे पाणी कोठून आणणार हा यक्ष प्रश्न आहे.

पाणी वाटपातील बदलांमुळे हक्काचे पाणी मिळेना

उजनी धरण निर्मितीसाठी जिल्ह्यातील विशेष करून करमाळा व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या. त्यावेळी या शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्याचे अभिवचन शासनाकडून देण्यात आले होते, आता मात्र वारंवार होणाऱ्या पाणी वाटपातील बदलामुळे व पाणी पळवापळवीमुळे येथील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे.