शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचे उचल पाणी मिळण्याच्या आशा बळावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:17 IST

सांगोला तालुक्यातील शेतकरी शेतीला पाणी मिळावे म्हणून कायम संघर्ष करत आला आहे. त्यामुळे गेली ५० ते ५५ वर्षे ...

सांगोला तालुक्यातील शेतकरी शेतीला पाणी मिळावे म्हणून कायम संघर्ष करत आला आहे. त्यामुळे गेली ५० ते ५५ वर्षे टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा आणि सांगोला उपसा सिंचन योजना अर्थात उजनीच्या उचल पाण्यावर शेतीच्या पाण्यावर निवडणुका लढवल्या आहेत. टेंभू, म्हैसाळ या योजना मार्गी लागल्या असल्या तरी काहीअंशी कामे बाकी आहेत.

युती सरकारच्या काळात सन १९९५ साली आ. शहाजीबापू पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. आ. पाटील हे सांगोल्याला टेंभू, म्हैसाळ, उजनीचे उचल पाणी शेतीला मिळावे म्हणून सरकारकडे पाठपुरावा करत होते. तत्कालीन जलसंपदामंत्री महादेव शिवणकर यांनी १९९६-९७ साली सांगोला उपसा सिंचन योजना उजनीच्या ३.८१ टीएमसी उचल पाण्यास मंजुरी दिली होती.

त्यानंतर २००१ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मंजूर ३.८१ टीएमसीतून १.८१ टीएमसी पाणी परंडा तालुक्याला दिले होते. त्यामुळे सांगोल्याचे १.८१ टीएमसी पाणी कमी झाले. मंजूर पाणी तोंडले-बोंडले येथून उचलून मगराचे निमगाव महालिंगराया टेकावर टाकून ते नीरा उजवा कालव्यातून सांगोल्याला द्यायचे नियोजन केले होते; परंतु ते रद्द केले. सन २००१ साली सांगोला तालुक्यासाठी हेच पाणी धानोरे ते साळमुख, अशी पाइपलाइन करून नीरा उजवा कालवा फळवणी येथे टाकून पुढे सांगोल्याला देण्याचे नियोजन करून अंदाजपत्रकात ७५ लाख रुपये मंजूर झाले. त्यानंतर या योजनेचा कोणताच पाठपुरावा न झाल्यामुळे व प्रशासकीय मान्यता मिळूनही काम न चालू झाल्यामुळे या योजनेची मान्यता रद्द झाली होती.

सुधारित प्रस्तावाला मान्यता मिळेल

सांगोल्याच्या हक्काच्या उजनीतील २ टीएमसी पाण्याला धक्का लागलेला नाही. मंगळवेढा कार्यकारी संचालक जोशी यांच्याकडून सांगोला उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी मंगळवेढा कार्यालयातून सदरचा प्रस्ताव सिंचन भवन, पुणे या कार्यालयाकडे पाठवला आहे. लवकरच सुधारित प्रस्तावास मान्यता मिळेल. त्यानंतर उजनी उचल पाणी योजना मार्गी लागेल, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

दोन वेळा मंत्रीपद मिळूनही योजना मार्गी लागली नाही

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना तालुक्यातील जनतेने एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ११ वेळा केवळ शेतीच्या पाणी प्रश्नावर निवडून दिले. महाराष्ट्र सरकारमध्ये दोन वेळा मंत्रीपदाची संधी मिळूनही सांगोला उपसा सिंचन योजना (उजनी उचल पाणी) मार्गी लावता आली नाही, हे सांगोल्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत.