शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

उजनीची वाटचाल मंद गतीने प्लसकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST

भीमानगर : भीमा खोऱ्यातील १८ धरणांत अद्यापही समाधानकारकरीत्या पाणी साठा झालेला नाही. याचं कारण म्हणजे भीमा खोरे मोठ्या पावसाच्या ...

भीमानगर : भीमा खोऱ्यातील १८ धरणांत अद्यापही समाधानकारकरीत्या पाणी साठा झालेला नाही. याचं कारण म्हणजे भीमा खोरे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. वरील सर्व धरणे भरल्यानंतरच उजनी धरणात अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होईल. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच भीमा खोऱ्यामध्ये केव्हा मोठा पाऊस सुरू होईल आणि उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वाढेल याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरचे डोंगर, मावळ भाग, लोणावळ्याचा पश्चिम भाग, तसेच नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग या सर्व विभागांमध्ये अद्याप मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मुळा-मुठा, पवना, इंद्रायणी या नद्यांना पूरसदृश परिस्थिती नाही.

या नद्या पुढे भीमा नदीला येऊन मिळतात व त्यामुळे दौंड येथून उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढतो; परंतु सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असला तरी उजनी धरणात मात्र अद्यापही उणे ६ टक्के पाणी आहे. अतिशय धीम्या गतीने धरणाच्या टक्केवारीची वाटचाल मायनसकडून प्लसकडे सुरू आहे. उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग खूपच कमी प्रमाणात आहे.

चालू पावसाळी हंगामाच्या सुरुवातीच्या ४६ दिवसांत उजनी धरणाच्या १८ धरणसाखळी क्षेत्रांत ६५२९ मि.मी., तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १९७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारण १५ जूनदरम्यानपर्यंत उजनी धरणाची टक्केवारी तब्बल उणे २३ टक्क्यांपर्यंत गेली होती. त्यात आतापर्यंत १७.७७ टक्के वाढ होऊन ती -६.२३ टक्क्यांवर आली आहे. सध्या उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ४९०.६१० मीटर, एकूण साठा १७२१.४७ दलघमी, तर मृतसाठा उणे ९४.५६ दलघमी व टक्केवारी उणे ५ टक्के एवढी आहे.

उजनीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ४५ दिवसांत ६५२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे उजनी धरणात काही प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. येथून अद्याप विसर्ग सुरू झालेला नाही.