शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

उजनी धरणाची ९० टक्क्यांकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST

भीमाशंकर घाटमाथ्यावर मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे. पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानेही व्यक्त ...

भीमाशंकर घाटमाथ्यावर मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे. पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानेही व्यक्त केली आहे. तसेच उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या बहुतेक धरणातील पाणी पातळी ९० टक्क्यांच्या जवळपास असल्याने पाणी भीमा नदीत सोडले जाऊ शकते. त्यामुळे उजनीत येणारा विसर्ग वाढून धरण भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी आहे.

मागील महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने धरणातील पाणीपातळी ६० टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. त्यानंतर त्यात वाढ होऊन ती संथगतीने का होईना ९० टक्क्यांकडे वाटचाल करत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत धरणात ८३.३० टक्के पाणीसाठा झाला आहे. बंडगार्डन येथून विसर्ग वाढल्याने धरण दोन-तीन दिवसात नव्वद टक्क्यांची पातळी ओलांडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

.........

धरणाची सद्यस्थिती

एकूण पाणी पातळी :४९६.०५० मीटर

एकूण पाणीसाठा: १०८.३४ टीएमसी

उपयुक्त साठा : ४४.६५ टीएमसी

टक्केवारी : ८३.३०