शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! उजनी धरण आले प्लसमध्ये; २४ तासात १४ टक्क्यांनी उजनीत वाढले पाणी

By appasaheb.patil | Updated: July 26, 2024 10:18 IST

गुरूवारी सायंकाळी बंडगार्डन येथील १ लाखाचावर असणारा विसर्ग घटला असला तरी दौंड येथील विसर्ग दीड लाख क्युसेक पर्यंत गेला आहे.

गणेश पोळ

टेंभुर्णी : सोलापूर, पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण सकाळी ९.३० वाजता मृत साठ्यातून बाहेर येऊन ०.१३ टक्के उजनी धरणाची पाणी पातळी झाली होती. सात महिन्यापुर्वी उजनी २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात गेले होते. गेल्या ५६ दिवसात ३३ टिएमसी पाणीसाठा उजनी धरणात जमा झाला आहे. तर गेल्या २४ तासात १४ टक्यांनी उजनीची झपाट्याने वाढ झाली आहे.

गुरूवारी सायंकाळी बंडगार्डन येथील १ लाखाचावर असणारा विसर्ग घटला असला तरी दौंड येथील विसर्ग दीड लाख क्युसेक पर्यंत गेला आहे. सध्या बंडगार्डन येथून ४१ हजार ५७१ क्युसेक विसर्ग असून दौंड येथून १ लाख ४८ हजार १४९ क्युसेकने पाणी उजनी धरणात मिसळत आहे. गेल्या २४ तासात उजनी धरणात ८ टिएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. आज ( दि. २६ ) शुक्रवार पासून उजनी उपयुक्त पाणी पातळीत येणार असून उजनी धरण शंभर टक्के भरल्यास ऊस लागवडीला वेग येणार आहे.

खडकवासला धरणातून विसर्ग

भीमा खोऱ्यातील आठ धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. पुणे शहरातील पुराची पातळी स्थीर रहावी म्हणून खडकवासला धरणातून कमी अधिक प्रमाणात सातत्याने विसर्ग सोडण्यात येत आहे. सातारा व पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने शुक्रवारी रेड अलर्ट दिल्याने ९० टक्के पर्यंत भरलेले खडकवासला धरण ६३ टक्के पाणी पातळी कमी केली आहे. खडकवासला मधून १४ हजार क्युसेक, मुळशी १० हजार ७००, कासारसाई १ हजार ६००, वडीवळे २ हजार १७२, चासकमान ६ हजार ३०, कळमोडी ३ हजार, चिलईवाडी २ हजार, वडज ४ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस