शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

खुशखबर! उजनी धरण आले प्लसमध्ये; २४ तासात १४ टक्क्यांनी उजनीत वाढले पाणी

By appasaheb.patil | Updated: July 26, 2024 10:18 IST

गुरूवारी सायंकाळी बंडगार्डन येथील १ लाखाचावर असणारा विसर्ग घटला असला तरी दौंड येथील विसर्ग दीड लाख क्युसेक पर्यंत गेला आहे.

गणेश पोळ

टेंभुर्णी : सोलापूर, पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण सकाळी ९.३० वाजता मृत साठ्यातून बाहेर येऊन ०.१३ टक्के उजनी धरणाची पाणी पातळी झाली होती. सात महिन्यापुर्वी उजनी २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात गेले होते. गेल्या ५६ दिवसात ३३ टिएमसी पाणीसाठा उजनी धरणात जमा झाला आहे. तर गेल्या २४ तासात १४ टक्यांनी उजनीची झपाट्याने वाढ झाली आहे.

गुरूवारी सायंकाळी बंडगार्डन येथील १ लाखाचावर असणारा विसर्ग घटला असला तरी दौंड येथील विसर्ग दीड लाख क्युसेक पर्यंत गेला आहे. सध्या बंडगार्डन येथून ४१ हजार ५७१ क्युसेक विसर्ग असून दौंड येथून १ लाख ४८ हजार १४९ क्युसेकने पाणी उजनी धरणात मिसळत आहे. गेल्या २४ तासात उजनी धरणात ८ टिएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. आज ( दि. २६ ) शुक्रवार पासून उजनी उपयुक्त पाणी पातळीत येणार असून उजनी धरण शंभर टक्के भरल्यास ऊस लागवडीला वेग येणार आहे.

खडकवासला धरणातून विसर्ग

भीमा खोऱ्यातील आठ धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. पुणे शहरातील पुराची पातळी स्थीर रहावी म्हणून खडकवासला धरणातून कमी अधिक प्रमाणात सातत्याने विसर्ग सोडण्यात येत आहे. सातारा व पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने शुक्रवारी रेड अलर्ट दिल्याने ९० टक्के पर्यंत भरलेले खडकवासला धरण ६३ टक्के पाणी पातळी कमी केली आहे. खडकवासला मधून १४ हजार क्युसेक, मुळशी १० हजार ७००, कासारसाई १ हजार ६००, वडीवळे २ हजार १७२, चासकमान ६ हजार ३०, कळमोडी ३ हजार, चिलईवाडी २ हजार, वडज ४ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस