शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

उजनीनं साठी ओलांडली.. आता कालव्याला पाणी सोडण्यासाठी जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:26 IST

भीमानगर : उजनीचा एकूण पाणीसाठा ९६.५ टीएमसी झाला असून, उपयुक्त पाणीसाठा ३३.२५ टीएमसी झाला आहे, तर दहीगाव उपसा ...

भीमानगर : उजनीचा एकूण पाणीसाठा ९६.५ टीएमसी झाला असून, उपयुक्त पाणीसाठा ३३.२५ टीएमसी झाला आहे, तर दहीगाव उपसा सिंचन १२६ क्युसेक्स, सीना माढा २५९ क्‍युसेक व बोगदा १५० क्‍युसेकने विसर्ग सुरू असून धरणाची टक्केवारी ६२.४० वरच गेले दोन दिवस झाले स्थिरावली आहे. आता कालव्याला पाणी सोडण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

बंडगार्डनमधून ४३५९ क्युसेक, दौंडमधून ३६३५ क्युसेक्स विसर्ग स्थिर असून पुणे जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यावरच आता उजनीच्या विसर्गात वाढ होणार आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. कालवा काठावरील बागायती पिके हातातोंडाशी आलेली आहेत; परंतु पाऊस पडेना झाल्याने या पिकांसाठी कालव्यातील उचल पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यातच उजनीच्या वरील जवळपास १० मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. येणाऱ्या काळात पडणाऱ्या पावसाचे पाणी हे उजनीत येणार आहे त्यामुळे उजनी आता भरणार तर आहेच मग उजनीवरती असणाऱ्या योजनेवर अवलंबून असणाऱ्या अनेक योजनांना थोडे थोडे का होईना पण पाणी द्यावे, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होऊ लागली आहे.

---