शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या कालव्याला पाणी आलं अन् वीज गुल झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:27 IST

पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही या परिसरात पाणीपातळी वाढण्यास उपयुक्त पाऊस झाला नाही. त्यामुळे शेती ...

पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही या परिसरात पाणीपातळी वाढण्यास उपयुक्त पाऊस झाला नाही. त्यामुळे शेती पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. असे असताना उजनी कालव्यातून पाणी सोडण्याच्या शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला शासन स्तरावरून प्रतिसाद देऊन उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले आहे. परंतु, वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी थेट रोहित्र बंद करण्याचा सपाटा चालू केला आहे.

या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची सोडाच, पण पिण्याच्या पाण्याचीही पंचाईत झाली आहे. अशातच खराब हवामान असल्यामुळे द्राक्ष, डाळिंब बागांची फवारणी करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे बागांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोनाने शेतकरी आर्थिक संकटात

मागील १७ महिन्यांपासून देशात कोरोनाने चांगलेच प्रस्थ माजवले आहे. शेतीमध्ये पीक आहे, परंतु पिकाला भाव मिळत नाही. कवडीमोल दराने शेतीमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुली मोहीम थेट रोहित्रे बंद करून सुरू केली आहे. त्यामुळे शेती पिकांना याचा फटका बसून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.

कोट :::::::::::::::::

मागील तीन महिन्यांपूर्वी प्रतिरोहित्र ५० हजार रुपये बाकी भरून घेतली. असे असताना वीज बिलासाठी रोहित्र बंद करणे महावितरणने बंद न केल्यास आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागेल.

- शहाजान शेख

जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना