शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रेवणगाव अपघातात दोघे ठार

By admin | Updated: January 14, 2015 23:20 IST

एसटीची दुचाकीला धडक : मृत सांगोला तालुक्यातील अचकदाणी गावचे

विटा : खानापूरहून विट्याकडे येणाऱ्या कर्नाटक महामंडळाच्या एसटी बसने विट्याहून खानापूरकडे निघालेल्या दुचाकी गाडीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार झाले. अमोल नंदकुमार जाधव (वय २१) व त्यांचा चुलत भाऊ गणेश जाधव (१८, दोघेही रा. अचकदाणी-लोटेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. ही घटना आज, (बुधवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रेवणगाव (ता. खानापूर) येथे घाटातील वळणावर घडली.सांगोला तालुक्यातील अचकदाणी (लोटेवाडी) येथील अमोल जाधव व त्यांचा चुलत भाऊ गणेश हे दोघेजण आज बुधवारी दुपारी १ वाजता सुळेवाडी (विटा) येथे बहिणीला भेटण्यासाठी आले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते परत अचकदाणी गावाकडे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच ०९-एफ-३३९१) निघाले असताना, इंडी (विजापूर) हून साताऱ्याकडे जाणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (क्र. केए-२८-एफ-१८०६) रेवणगाव घाटातील पहिल्या वळणावर या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोघेही तरूण जागीच ठार झाले.या अपघाताची माहिती विटा पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. घोंगडे, उपनिरीक्षक अमोल शिंदे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अमोल यांच्या मोबाईलवरून संपर्क साधून अपघाताची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्याचवेळी सुळेवाडी येथील अमोलचे मेहुणे शांताराम पोळ घटनास्थळी गेले. अपघातात ठार झालेल्या दोन्ही तरूणांचे मृतदेह विटा ग्रामीण रूग्णालयात आणून शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अपघातात ठार झालेला अमोल हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील ऊसतोड मजुरीचे काम करतात, तर अमोलचा सख्खा चुलत भाऊ गणेश हा सांगोला येथे इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. दोघेही अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, आजी, आजोबा असा परिवार आहे. या अपघाताची फिर्याद अमोल यांचे मेहुणे शांताराम पोळ यांनी विटा पोलिसांत दिली असून, तपास उपनिरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)बहिणीची अखेरची भेटसांगोला तालुक्यातील अचकदाणी (लोटेवाडी) येथील अमोल जाधव व त्यांचा चुलत भाऊ गणेश हे दोघेजण आज बुधवारी सुळेवाडी (विटा) येथे बहिणीला भेटण्यासाठी आले होते. सायंकाळी परत अचकदाणी गावाकडे निघाले असताना, इंडी (विजापूर) हून साताऱ्याकडे जाणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रेवणगाव घाटातील पहिल्या वळणावर या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही तरूण जागीच ठार झाल्यामुळे त्यांची बुधवारची अखेरचीच भेट झाली.दोघे तरूण जागीच ठार झाल्यामुळे नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.अपघातात ठार झालेला अमोल हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील ऊसतोड मजुरीचे काम करतात, तर अमोलचा सख्खा चुलत भाऊ गणेश हा सांगोला येथे इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.