शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

बगिचा व्हावा, होऊ नये यासाठी भाजपाच्या दोन गटांचे उपोषण मिटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST

जुना किणी रोडजवळ शासनाकडून मंजूर केलेला बगीचा व्हावा म्हणून एक गट तर दुसरा गट होऊ नये म्हणून नगरपालिकेसमोर दोन ...

जुना किणी रोडजवळ शासनाकडून मंजूर केलेला बगीचा व्हावा म्हणून एक गट तर दुसरा गट होऊ नये म्हणून नगरपालिकेसमोर दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु होते. उपोषण करणारे दोन्ही गट भाजपाचे होते. यामुळे शहरात उलटसुलट चर्चा होत होती. उपोषण सोडविण्यासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत भाजपचे एक शिष्टमंडळ प्रयत्नशील होते. मात्र यश आले नव्हते. अखेर गुरुवारी त्याच शिष्टमंडळाला यश आले.

किणी रोडवरील वस्ती येथे नगरपालिकेच्या मालकीच्या आरक्षित खुली जागेत बाग विकसित करणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान मुलांना व ज्येष्ठांना खेळण्यासाठी, बसण्यासाठी सोयीचे होणार आहे. असे मत ग्वल................. समाज पंचकमिटीचे होते. हा बगिचा होण्यासाठी नगरपालिकेसमोर नगरसेवक जितेंद्र यारोळे, ईरेषा यारोळे, सुखदेव चिंचोळकर, तुळजाराम यारोळे यांच्यासह अनेकांंनी उपोषण सुरू केेले होते.

त्यांचा विरोधी गट असलेल्या बगिचा हटाव संघर्ष समितीने मात्र बगिचा होऊ नये, त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे. बगिचा झाल्यास अंत्यविधी कुठे करणार, बगिचा झाल्यास शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जाणार आहेत. यापूर्वी शहरात मैंदर्गी रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीजवळ लाखो रुपये खर्चून तयार केलेल्या बगिचाची अवस्था काय झाली, अशी भूृमिका घेऊन उपोषण सुरू केले होते.

बगिचा होऊ नये म्हणून अंकुश चौगुले, रिपाइंचे अविनाश मडिखांबे, नगरसेवक विकास मोरे, अंबूबाई कामनूरकर, अश्विनी मोरे, अमर सिरसाट, सुनील खवळे, योगेश पवार, प्रसाद माने, अप्पू पराणे, ऋषिकेश लोणारी, सिद्धराम माळी आदी उपोषणाला बसले होते.

उपोषण सोडवण्यासाठी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, बसलिंगप्पा खेडगी, उत्तम गायकवाड, सलीम येळसंगी यांनी प्रयत्न केले. अखेर दुसऱ्या दिवशी यश आले.

--------

बगिचा होऊ नये म्हणून उपोषणाला बसलेल्या नगरसेवकांनी कायदेशीर बाबी पूर्ण होण्याआधी हरकत घ्यायला हवी होती. बगिचा होण्यासाठी शासनाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. दप्तरी बगिचासाठी जागा आरक्षित आहे. आम्ही कोणालाही उपोषणाला परवानगी दिली नव्हती. अखेर बगिचा कामाला स्थगिती दिली. उर्वरित कामे करण्यात येणार आहेत.

- सचिन पाटील, मुख्याधिकारी

------

पोलीस ठाण्याकडून कोणत्याही प्रकारच्या उपोषणाला परवानगी दिली नाही. त्यासाठी त्यांच्याकडून अर्ज प्राप्त झाला होता. चार लोक बसू शकतात. त्यापेक्षा अधिक लोक बसलेले दिसल्यास कारवाईला पात्र राहावे लागते. गुरुवारी उपोषण मिटले आहे.

- गोपाळ पवार, पोलीस निरीक्षक, उत्तर

पोलीस ठाणे.