शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

‘कोल्हापूर बंद’चा प्रयत्न

By admin | Updated: August 2, 2014 00:01 IST

पोलिसांची कडक भूमिका : राजेश क्षीरसागर यांच्यासह २७ जण ताब्यात

कोल्हापूर : शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांना येळ्ळूर येथे येण्यास मज्जाव केला. या घटनेच्या निषेथार्थ आज, शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर ‘बंद’चे आवाहन केले. दुचाकीवरून आवाहन करत जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ‘बंद’चा प्रयत्न अयशस्वी झाला. याप्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह २७ हून अधिक कार्यकर्त्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन सुटका केली. रावते यांना रोखल्याचे वृत्त समजताच शहरातील शिवसैनिक आमदार क्षीरसागर यांच्या शनिवार पेठ येथील निवासस्थानी एकत्र जमले. येथून आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली दुचाकीवरून कोल्हापूर ‘बंद’चे आवाहन करीत कार्यकर्ते महाद्वार रोड मार्गे पापाची तिकटी येथे येत होते. हा प्रकार समजताच पोलिसांनी आमदार क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी कोल्हापूर बंद करू नका, असे आमदार क्षीरसागर यांना सांगितले. क्षीरसागर यांनी कोल्हापूर बंद न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या सर्वांवर कारवाई करून पोलिसांनी सोडून दिले. पोलीस अधीक्षकांची सतर्कतामागील वर्षी शिवसेनेने बेळगावच्या मुद्द्यावर कोल्हापूर बंदची हाक दिली होती. यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली होती. यामुळे पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी तातडीने शिवसैनिक जमा होऊन काही घडण्याच्या अगोदरच त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील ‘राडा’ टळला.सरकारी ‘चहापान’ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांचा पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर जबाब घेण्याचे काम सुरू होते. यावेळी नावनोंदणी करेपर्यंत चहा मागविण्यात आला. या चहाचा आमदारांसह सर्व कार्यकर्त्यांनी आस्वाद घेतला. इतरवेळी कडक भूमिका वटविणाऱ्या पोलिसांच्या हातात चहाचा ट्रे बघून उपस्थितांना थोडे आश्चर्यच वाटले. पोलिसांच्या या ‘सरकारी चहापाना’ने कार्यकर्ते चांगलेच सुखावले.नागरिकांचा  उडाला गोंधळ !अचानक शिवसेनेचे कार्यकर्ते दुकान बंद करण्याचे आवाहन करू लागल्याने व्यापाऱ्यांसह नागरिक गोंधळून गेले. नेमके काय झाले याची विचारपूस नागरिक पोलिसांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे करत होते. अटक केलेले शिवसैनिक आमदार राजेश क्षीरसागर, शहरप्रमुख शिवाजी जाधव व दुर्गेश लिंग्रस, ऋतुराज क्षीरसागर, जयवंत हारूगले, गजानन भुर्के , राजू पाटील, विक्रम पोवार, अजिंक्य गायकवाड, राजू जाधव, अमित चव्हाण, सुधीर काशीद, सुनील भोसले, दीपक चव्हाण, बाळासाहेब पांडव, सागर मूलधरणी, सुजित देशपांडे, रमेश खाडे, धर्माजी सायनेकर, अर्जुन संकपाळ, नीलेश जाधव, सुनील जाधव, ओंकार परमणे, चेतन शिंदे, राजू जाधव, रमेश पोवार, केतन राऊत, आदींना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.