शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुर्डूवाडी रेल्वे कारखान्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: June 26, 2014 01:21 IST

रामदास आठवले: रेल्वे गाड्यांच्या नियमिततेबाबत दक्ष

पंढरपूर : कुर्डूवाडी (ता. माढा) येथील रेल्वे कारखाना कायमस्वरुपी चालू करण्याबरोबरच व पंढरपूर-मुंबई ही रेल्वेगाडी रोज धावावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी बुधवारी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्रानेच भाजपाला चांगले यश मिळवून दिले आहे. यामुळे आम्ही एक शिष्टमंडळ तयार करून महाराष्ट्राचा विकास आराखडा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. या आराखड्यामध्ये महाराष्ट्रात जादा नोकरींची संधी उपलब्ध होण्यासाठी चांगले उद्योग, प्रकल्प, वीज, रस्ते, विविध विकासकामे सादर करण्यात येणार असल्याचे खा. आठवले म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत रिपाइंने राष्ट्रवादी व काँग्रेसला चांगलाच धडा शिकवला असून दलित मते महायुतीच्या बाजूने असल्याने जादा जागेवर उमेदवार निवडून आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीसाठी २५ जागांची मागणी करणार आहे. यामध्ये १४ राखीव जागांची मागणी करणार आहे. त्याचबरोबर ५० टक्के जागांवर सर्व जातीचे उमेदवार उभे करणार आहे. अपक्ष आमदारांना रिपाइंबरोबर घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही अभिनेते रिपाइंमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचे खा. रामदास आठवले यांनी सांगितले.यावेळी रिपाइंचे राजाभाऊ सरवदे, प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, सुनील सर्वगोड, आबासाहेब दैठणकर, हणमंत साठे, पुरुषोत्तम वाडेकर, जितेंद्र बनसोडे, बाळासाहेब कसबे, संतोष सर्वगोड, महादेव भालेराव, दीपक चंदनशिवे उपस्थित होते. ---------------------------जिल्ह्यातून दोन जागांची मागणी करुसोलापूर जिल्ह्यात रिपाइंची चांगली ताकद आहे. यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोन जागा रिपाइंला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. रामदास आठवले यांनी सांगितले.