शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पाकसमवेत शत्रूराष्ट्राप्रमाणे व्यवहार करा : वर्तक

By admin | Updated: October 22, 2015 21:10 IST

मोदी शासनाला जनतेने मोठय़ा अपेक्षेने निवडून दिले आहे. इस्रायलप्रमाणे भारताने आता पाकिस्तानशी कठोरपणे वागण्यास प्रारंभ करावा.

 सोलापूर : मोदी शासनाला जनतेने मोठय़ा अपेक्षेने निवडून दिले आहे. इस्रायलप्रमाणे भारताने आता पाकिस्तानशी कठोरपणे वागण्यास प्रारंभ करावा. पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र असल्याने त्यांच्यासमवेत चाणक्यनीतीनुसार शत्रूराष्ट्राप्रमाणेच व्यवहार करावा, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत केले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात अभय वर्तक बोलत होते. ते म्हणाले, भारतापुढे इतिहासातील अफजलखानापासून मोहम्मद घोरीच्या विश्‍वासघाताची उदाहरणे समोर आहेत. भारतातील काही निधर्मी लोकांना पाकिस्तानविषयी विनाकारण प्रेम उफाळून येत आहे. भारतीय चित्रपट, कलाकार यांच्यावर पाकिस्तानात सातत्याने बंदी घातली जात असताना भारतातील वाहिन्यांवर पाकिस्तानी कलाकार निर्धास्तपणे वावरत आहेत. पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध पुन्हा सुरळीत होण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते. भारतात सीमेवरील गोळीबार असो, जवानांचे गळे कापून हत्या असो वा आतंकवादाला साहाय्य असो, या सर्व कारवायांत सातत्याने पाकिस्तानचा सहभाग सिद्ध झालेला आहे. त्यामुळे आपण पाकिस्तानशी शांतता चर्चा करून, पाकिस्तानी खेळाडूंना आणि कलाकारांना भारतात मोकळीक देऊन बलिदान दिलेल्या निरपराध भारतीयांचा अपमान करत आहेत. गेल्या ६७ वर्षांच्या अनुभवातून पाकिस्तानशी कितीही चर्चा करून, गाणी गाऊन वा क्रिकेट खेळून त्यांचे वाकडे शेपूट सरळ झालेले नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील लोकांचे कार्यक्रम ठेवणे याचा दुसरा अर्थ ते करीत असलेले सर्व गुन्हे क्षम्य आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक आर्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे शत्रूसमवेत शत्रूप्रमाणेच व्यवहार करणे अपेक्षित आहे. तसेच ज्या कौटिल्याने जगाला राजधर्म शिकवला त्यांच्याकडून आपल्या राज्यकर्त्यांनी शिकले पाहिजे, असेही यावेळी अभय वर्तक म्हणाले. (प्रतिनिधी)