शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

१०० गावं समृद्ध करण्यासाठी सरपंचांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:23 IST

सोलापूर सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या समृद्ध गाव जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आमदार देशमुख बोलत होते. या समितीच्या कामाचे विकेन्द्रीकरण ...

सोलापूर सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या समृद्ध गाव जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आमदार देशमुख बोलत होते. या समितीच्या कामाचे विकेन्द्रीकरण करावे, महिला सरपंचांची समिती स्वतंत्र असावी आणि युवकांना गाव पातळीवर रोजगार मिळेल असे कार्यक्रम राबवण्यावर भर द्यावा अशा मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्या.

समितीचे सदस्य असलेले फाऊंडेशनचे सल्लागार मोहन अनपट यांनी या समितीची कल्पना उपस्थित सदस्यांना समजावून दिली. उपस्थित असलेल्या सरपंचांनी तालुका स्तरावर समृद्ध गाव अभियान समित्या स्थापन कराव्यात असे आवाहन त्यांनी केेले. समितीचे सदस्य असणाऱ्या सरपंचांनी शासनाच्या योजना समजून घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.

होटगीचे अतुल गायकवाड यांनी होटगी येथील साईबाबा मंदिराचे मार्केटिंग व्हावे तर गणेश पाटील यांनी गाव पातळीवर विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. संतोष दळवी यांनी जिल्हास्तरीय समितीला तांत्रिक मार्गदर्शन करणारी स्वतंत्र यंत्रणा असावी अशी सूचना मांडली. तसेच कोणतेही काम गावकर्‍यांच्या सहभागातून घडवावे असेही आवाहन केले.

बार्शीचे राहूल भड यानी प्रत्येक तालुक्यात पाच गावांची पथदर्शक म्हणून निवड करावी आणि त्यांचा विकास नियोजनपूर्वक करावा अशी कल्पना मांडली.

नागेश कोकरे यांनी, समितीच्या सदस्यांनी गावांना भेटी द्याव्यात आणि कोणतेही काम करताना गावकर्‍यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्यावे असे मत मांडले.

या बैठकीला संचालक मयुरी वाघमारे शिवगुंडे, मुख्य समन्वयक विजय पाटील, विपुल लावंड, विजय कुचेकर, अनंता चव्हाण, सोमनिंग कमळे, हरिभाऊ यादव, सचिन सुरवसे, जालिंदर बनसोडे, चिदानंद माळगे, अशोक जाधवर, तात्या गोडगे, प्रवीण कांबळे, श्रीमंत बंडगर, शहाजी देशमुख हे उपस्थित होते.

---