शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आमदाराचा वारस आमदार न होण्याची परंपरा अखंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST

पंढरपूर तालुक्यात देश स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास ७४ वर्षांच्या इतिहासात येथील नागरिकांनी आठ लोकप्रतिनिधींना विधानसभेत पाठविले. त्यानंतरच्या कालावधीत ते हयात ...

पंढरपूर तालुक्यात देश स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास ७४ वर्षांच्या इतिहासात येथील नागरिकांनी आठ लोकप्रतिनिधींना विधानसभेत पाठविले. त्यानंतरच्या कालावधीत ते हयात असताना किंवा त्यांच्या निधनानंतर काही पक्षांनी त्यांच्या वारसांना तिकिटे दिली नाहीत तर काहींना तिकीट देऊनही त्यांना विधानसभा पंचवार्षिक व पोटनिवडणुकीत निवडून येता आले नाही. त्यामुळे त्या कालावधीत नवीन चेहऱ्यांना आमदार म्हणून निवडून देण्याची भूमिका पंढरपूरच्या जनतेने घेतली आहे.

मागील महिन्यात दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक पंढरपूर तालुक्यात १९५८ नंतर तब्बल ६३ वर्षांनी लागली होती. सलग तीन टर्म विजयाची हॅट‌्ट्रिक करणारे राष्ट्रवादीचे आ. भारत भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे पोटनिवडणूक लागली. भगीरथ भालके हे सहानुभूतीच्या लाटेवर सहज विजयी होतील व ७४ वर्षांपासून अखंडित परंपरा खंडित होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. मात्र निवडणूक निकालानंतर भाजपचे समाधान आवताडे धक्कादायक विजय संपादन करत ही परंपरा अखंडित ठेवली आहे.

आता होऊन गेलेल्या माजी आमदारांपैकी भालके व परिचारक कुटुंबातीलच वारस राजकारणात तग धरून आहेत. भविष्यात ही परंपरा खंडित करण्यासाठी या दोघांमध्येच पुन्हा राजकीय संघर्ष पहावयास मिळणार आहे. या दोघांना तरी ही परंपरा खंडित करणे शक्य होते की भविष्यात आणखी कोण नवीन चेहरा समोर येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आजपर्यंत पंढरपूरचे नेतृत्व केलेले आमदार

बाबूराव जोशी (१९४८ ते १९५२), बाळासाहेब मोरे (१९५२ ते १९५७), रघुनाथ नामदेव ऊर्फ भाई राऊळ (१९५७ ते १९५८), नारायण पटवर्धन (१९५८ ते १९६२), औदुंबर पाटील (१९६२ ते १९८०), पांडुरंग ऊर्फ तात्यासाहेब डिंगरे (१९८० ते १९८५), सुधाकरपंत परिचारक (१९८५ ते २००९), भारत भालके (२००९ ते २०२०). विशेष म्हणजे यापूर्वी मागील ७४ वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत निवडून गेलेले हे आठही आमदार आज हयात नाहीत.

परिचारक, पाटील यांच्यानंतर भालकेंचा सर्वाधिक काळ गाजला

पंढरपूरच्या इतिहासात आजपर्यंत तब्बल आठ लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केले असले तरी १९६२ ते १९८० पर्यंत सलग चारवेळा पंढरपूरचे आमदार म्हणून कै. औदुंबर पाटील यांनी आपला कार्यकाळ गाजविला. त्यानंतर त्यांच्यासोबत काम केलेले स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी एका पराभवानंतर १९८५ ते २००९ असा सलग पाचवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी होत आपला कार्यकाळ गाजविला. मात्र २००९ साली पक्षातील अंतर्गत धुसफूस थांबविण्यासाठी त्यांनी स्वत:हून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी जागा सोडली. त्यावेळी त्यांचा धक्कादायक पराभव करून राज्यभर जायंट किलर ठरलेले भारत भालके यांनी २००९ ते २०१९ अशा सलग तीन टर्म स्व. सुधाकरपंत परिचारक, आ. प्रशांत परिचारक यांचा पराभव करून आपला कार्यकाळ गाजविला. मात्र त्यांच्या निधनानंतर आता पोटनिवडणूक झाली आणि त्यांच्या पुत्रालाही पराभवाचा सामना करावा लागला.

------

यांना जनतेतून निवडून येता आले नाही

औंदुबरअण्णा पाटील यांच्या कुटुंबातून त्यांचे पूत्र राजाभाऊ पाटील यांनी दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली. सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांनी २०१४ साली निवडणुक लढवली व आता आ. भारत भालके यांचे पूत्र यांनी पोटनिवडणूक लढवली मात्र या तिघांनाही जनतेतून निवडून येता आले नाही.