शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आमदाराचा वारस आमदार न होण्याची परंपरा अखंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST

पंढरपूर तालुक्यात देश स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास ७४ वर्षांच्या इतिहासात येथील नागरिकांनी आठ लोकप्रतिनिधींना विधानसभेत पाठविले. त्यानंतरच्या कालावधीत ते हयात ...

पंढरपूर तालुक्यात देश स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास ७४ वर्षांच्या इतिहासात येथील नागरिकांनी आठ लोकप्रतिनिधींना विधानसभेत पाठविले. त्यानंतरच्या कालावधीत ते हयात असताना किंवा त्यांच्या निधनानंतर काही पक्षांनी त्यांच्या वारसांना तिकिटे दिली नाहीत तर काहींना तिकीट देऊनही त्यांना विधानसभा पंचवार्षिक व पोटनिवडणुकीत निवडून येता आले नाही. त्यामुळे त्या कालावधीत नवीन चेहऱ्यांना आमदार म्हणून निवडून देण्याची भूमिका पंढरपूरच्या जनतेने घेतली आहे.

मागील महिन्यात दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक पंढरपूर तालुक्यात १९५८ नंतर तब्बल ६३ वर्षांनी लागली होती. सलग तीन टर्म विजयाची हॅट‌्ट्रिक करणारे राष्ट्रवादीचे आ. भारत भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे पोटनिवडणूक लागली. भगीरथ भालके हे सहानुभूतीच्या लाटेवर सहज विजयी होतील व ७४ वर्षांपासून अखंडित परंपरा खंडित होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. मात्र निवडणूक निकालानंतर भाजपचे समाधान आवताडे धक्कादायक विजय संपादन करत ही परंपरा अखंडित ठेवली आहे.

आता होऊन गेलेल्या माजी आमदारांपैकी भालके व परिचारक कुटुंबातीलच वारस राजकारणात तग धरून आहेत. भविष्यात ही परंपरा खंडित करण्यासाठी या दोघांमध्येच पुन्हा राजकीय संघर्ष पहावयास मिळणार आहे. या दोघांना तरी ही परंपरा खंडित करणे शक्य होते की भविष्यात आणखी कोण नवीन चेहरा समोर येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आजपर्यंत पंढरपूरचे नेतृत्व केलेले आमदार

बाबूराव जोशी (१९४८ ते १९५२), बाळासाहेब मोरे (१९५२ ते १९५७), रघुनाथ नामदेव ऊर्फ भाई राऊळ (१९५७ ते १९५८), नारायण पटवर्धन (१९५८ ते १९६२), औदुंबर पाटील (१९६२ ते १९८०), पांडुरंग ऊर्फ तात्यासाहेब डिंगरे (१९८० ते १९८५), सुधाकरपंत परिचारक (१९८५ ते २००९), भारत भालके (२००९ ते २०२०). विशेष म्हणजे यापूर्वी मागील ७४ वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत निवडून गेलेले हे आठही आमदार आज हयात नाहीत.

परिचारक, पाटील यांच्यानंतर भालकेंचा सर्वाधिक काळ गाजला

पंढरपूरच्या इतिहासात आजपर्यंत तब्बल आठ लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केले असले तरी १९६२ ते १९८० पर्यंत सलग चारवेळा पंढरपूरचे आमदार म्हणून कै. औदुंबर पाटील यांनी आपला कार्यकाळ गाजविला. त्यानंतर त्यांच्यासोबत काम केलेले स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी एका पराभवानंतर १९८५ ते २००९ असा सलग पाचवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी होत आपला कार्यकाळ गाजविला. मात्र २००९ साली पक्षातील अंतर्गत धुसफूस थांबविण्यासाठी त्यांनी स्वत:हून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी जागा सोडली. त्यावेळी त्यांचा धक्कादायक पराभव करून राज्यभर जायंट किलर ठरलेले भारत भालके यांनी २००९ ते २०१९ अशा सलग तीन टर्म स्व. सुधाकरपंत परिचारक, आ. प्रशांत परिचारक यांचा पराभव करून आपला कार्यकाळ गाजविला. मात्र त्यांच्या निधनानंतर आता पोटनिवडणूक झाली आणि त्यांच्या पुत्रालाही पराभवाचा सामना करावा लागला.

------

यांना जनतेतून निवडून येता आले नाही

औंदुबरअण्णा पाटील यांच्या कुटुंबातून त्यांचे पूत्र राजाभाऊ पाटील यांनी दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली. सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांनी २०१४ साली निवडणुक लढवली व आता आ. भारत भालके यांचे पूत्र यांनी पोटनिवडणूक लढवली मात्र या तिघांनाही जनतेतून निवडून येता आले नाही.